शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंनी नेमली तात्पुरती टीम; विद्यापीठात प्र-कुलगुरू, चार अधिष्ठातांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 19:12 IST

नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सायंकाळी तात्पुरती टीम तयार केली.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. वाल्मीक सरवदे यांची तर डॉ. महेंद्र शिरसाट, डॉ. संजय साळुंके, डॉ. वीणा हुंबे आणि डॉ. वैशाली खापर्डे यांची अधिष्ठातापदी नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी नियुक्ती केली आहे. पूर्णवेळ प्र-कुलगुरू व अधिष्ठातांची नेमणूक होईपर्यंत हे प्रभारी अधिकारी काम पाहणार आहेत.

तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा ३१ डिसेंबर रोजी कार्यकाळ संपल्यानंतर पुण्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. डॉ. गोसावी यांनी काही दिवसांसाठी पद असल्यामुळे प्रभारी प्र-कुलगुरू, अधिष्ठातांची नियुक्ती केली नव्हती. नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सायंकाळी तात्पुरती टीम तयार केली. या नियुक्त्यांमुळे विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल. १ जानेवारीपासून अधिकारी नसल्यामुळे कामकाज खोळंबले होते. त्यामुळे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. सरवदे यांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावली आहे. त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. नव्या अधिनियमानुसार आता व्यवस्थापन परिषद आणि कुलगुरू यांनी सामंजस्याने प्र-कुलगुरूंची निवड करायची असते. त्यामुळे डॉ. सरवदे यांच्याकडे पूर्णवेळ प्र- कुलगुरूंची जबाबदारीदेखील येण्याची चिन्हे आहेत. पूर्वी कुलगुरूंच्या शिफारशीनुसार राज्यपाल तथा कुलपती प्र-कुलगुरूंची निवड करत होते. तसेच कुलसचिव म्हणून काम पाहिलेले डॉ. महेंद्र शिरसाट यांची तब्बल पाच वर्षांनी प्रशासनात पुन्हा ‘एन्ट्री’ झाली आहे. त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता केले आहे. त्याशिवाय मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. संजय साळुंके, वाणिज्यच्या प्रमुख डॉ. वीणा हुंबे यांच्याकडे वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचा कार्यभार सोपवला आहे. प्रभारी ग्रंथपाल डॉ. वैशाली खापर्डे यांच्याकडे आंतरविद्याशाखेचे काम सोपवले आहे.

सर्वसमावेश नियुक्त्या व्हाव्यातविद्यापीठाच्या प्राधिकरणांवर नियुक्त्या करताना सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वसमावेश नियुक्त्या झाल्या पाहिजेत. एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तींनाच प्रतिनिधित्व देण्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. ते नवनियुक्त कुलगुरूंनी टाळले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण