शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ देण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी केला रस्त्यावरच स्वयंपाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:07 PM

आंदोलकांनी वर्गणी गोळा करीत चुलीवर स्वयंपाक करून आयुक्तालय प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद :  दुष्काळ निवारण संघर्ष समितीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू केले असून, आज दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी वर्गणी गोळा करीत चुलीवर स्वयंपाक करून आयुक्तालय प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि हाताला काम देण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी समितीने आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी आंदोलकांनी विभागीय प्रशासनाची भेट घेऊन गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेटण्याची वेळ घेऊन देण्याची मागणी केली. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये मुक्ताराम गव्हाणे, माधवराव निर्मळ, बाळासाहेब अलगे, सुनील शिंदे, पुरण सनान्से, समाधान सुरासे, प्रकाश वाघ, अ‍ॅड. आसाराम लहाने, यादवराव कांबळे, सुभाष वागले, जगन्नाथ काथारे, श्रीनिवास वाकनकर, उद्धव देशमुख, तसेच महिलांचा सहभाग आहे. 

फायनान्स कंपन्यांकडून दमदाटी करणारी वसुली सुरू आहे, त्याला चाप बसविण्यात यावा. दिग्रस उच्चस्तर बंधाऱ्यातून पळविण्यात आलेल्या पाण्याची जायकवाडी प्रकल्पातून भरपाई करा, माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणी उपलब्ध करून सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील लाभक्षेत्रास पाणीपाळ्या द्या, इसाद प्रकल्पासाठी पाणी द्या, रोजगार मागणी केलेल्या सर्व मजुरांना रोहयोची किमान २०० दिवस कामे उपलब्ध करून द्या, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी, हाताला काम आणि सर्वांना रेशन यासह दुष्काळ निवारणासाठीच्या १३ सुविधा तात्काळ अमलात आणा,  ठोका, बटईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, वीज बिल माफ करा, आदी मागण्या समितीने निवेदनाद्वारे केल्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीChief Ministerमुख्यमंत्री