शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलकांनी जनशताब्दी एक्स्प्रेस रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 6:43 PM

Farmers Protest याप्रकरणी पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

लासूर स्टेशन ( औरंगाबाद ) : नवीन कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी किसान सभा व लालबावटा शेतमजूर युनियनच्या आंदोलकांनी गुरुवारी सकाळी रेल्वेरोकोआंदोलन केले. लासूर स्टेशन येथे आंदोलकांनी जनशताब्दी एक्सप्रेस अडवून केंद्र सरकारचा निषेध केला. याप्रकरणी पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार आज देशव्यापी रेल रोको आंदोलनाचा भाग म्हणून किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनआंदोलन संघर्ष समितीच्यावतीने लासूर स्टेशन येथे रेलरोको आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजेपासून किसान सभा व शेतमजूर युनियनच्या आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवर निदर्शने सुरू केली होती. जनशताब्दी एक्सप्रेस लासूर स्टेशनला येताच तिच्यासमोर रूळावरच आंदोलकांनी ठिय्या मांडला. नवीन कृषी कायदे रद्द करा, किमान आधारभूत भावाचा नवीन कायदा करा, राशन व्यवस्था वाचवा, दिल्ली येथील किसान आंदोलकांवरील दडपशाही थांबवा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेऊन रूळ रिकामा केला. 

आंदोलनात लासूर स्टेशन, गाजगाव, खादगाव, देरडा ,धामोरी, कोपरगाव ,गोळवाडी, दहेगाव,सिंधी सिरजगाव,कलीम टाकळी या दहा गावातील किसान सभा व शेतमजूर युनियनचे कार्यकर्ते सहभागी होते. आंदोलनाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय पंच सदस्य कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, किसान सभेचे जिल्हा सचिव कैलास कांबळे, जिल्हा धरणग्रस्त समितीचे भाऊसाहेब शिंदे किसान सभेचे गंगापुर तालुका पुढारी विलास शेंगुळे व सुरेश शेंगुळे महाराज, दौलतराव मोहिते, दत्तू काळवणे यांनी केले. आंदोलनात रूपचंद हिवाळे, जालिंदर धुमाळ, ज्ञानेश्वर गवळी, मच्छिंद्र धुमाळ ,फकीरचंद जाधव राजू जाधव ,किशोर पवार, लक्ष्मणराव तुपे, ज्ञानेश्वर कांबळे अनिल जाधव सुनील थोरात अंकुश, अंकुश लिंगायत, संतोष कांबळे ,संतराम कांबळे, ज्ञानेश्वर हिवाळे, गणेश कळसकर, कळसकर,कडू पाटील, कडू पाटील, अब्बु पठाण, दिगंबर वाघचौरे रामकिसन वाघचौरे, प्रीतम शिंदे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनagitationआंदोलनrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद