शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोग रुग्णालयाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 7:07 PM

स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि प्रतिबंधाला योजनाबद्ध स्वरूप देणे शक्य होईल.

ठळक मुद्देसंसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज समोर आली आहे. . संसर्गजन्य उपचारांची व्यवस्था एका छताखाली येईल. 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात अन्य रुग्णसेवा थांबवून केवळ कोरोनाचे उपचार करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती ओळखून प्रत्येक जिल्ह्यात आगामी काळात संसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले  आहे. 

शहरात चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे ३० मार्चपासून पूर्णपणे कोरोना रुग्णालयात रुपांतरित झाले.  ही परिस्थिती अन्य शहरांतही पाहायला मिळत आहे.  त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले जात आहे.

कोरोनाची चर्चा सुरू झाली की, सध्या पुण्यातील  डॉ. नायडू रुग्णालयाचे नाव घेतले जाते. हे रुग्णालय सव्वाशे वर्षांहून अधिक काळ विविध संसर्गजन्य आजारांचा समर्थपणे मुकाबला करीत आहे. प्लेग, देवी, कॉलरा, इन्फ्ल्युएन्झा, पोलिओ या सध्या हद्दपार झालेल्या आणि स्वाइन फ्लू , बर्ड फ्लू, सार्स, इबोला, निपाह आणि कोरोना या संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करीत हे रुग्णालय नागरिकांच्या दिमतीला उभे आहे; परंतु अन्य शहरांत अशा रुग्णालयांचा अभाव आहे. त्यामुळे  संसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज समोर आली आहे. स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि प्रतिबंधाला योजनाबद्ध स्वरूप देणे शक्य होईल. संसर्गजन्य उपचारांची व्यवस्था एका छताखाली येईल. 

कोरोनाच्या नियंत्रणानंतर प्रस्ताव : प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य  रोगासाठी रुग्णालय प्रस्तावित  करण्यात येत आहे. औरंगाबादचाही त्यात समावेश असेल. कोरोनाच्या उपचारासाठी सज्ज करण्यात आलेल्या इमारती आणि जेथे खाटा, व्हेंटिलेटर, आॅक्सिजनसह अन्य यंत्रणा आहे, त्याचे रूपांतर कोरोनाच्या नियंत्रणानंतर संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयात करावे, असे प्रस्तावित केले जाईल.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य