शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराच्या वसुलीत गेम!

By admin | Updated: August 13, 2014 01:43 IST

व्यावसायिक मालमत्तांकडून मागील चार वर्षांपासून करवसुली करण्यात पीछेहाट झाल्यामुळे पालिकेचे १०० कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : शहर चारही दिशांनी वेगाने वाढते आहे. पालिकेकडे बांधकाम परवानग्या त्या तुलनेने येत आहेत. असे असताना व्यावसायिक मालमत्तांकडून मागील चार वर्षांपासून करवसुली करण्यात पीछेहाट झाल्यामुळे पालिकेचे १०० कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले आहे.या मालमत्तांचे रेकॉर्ड न घेतल्यामुळे करवसुली झालेली दिसत नसली तरी मनपातील महाभागांनी ही रक्कम वसूल करून १०० कोटींचा गेम केल्याचा संशय बळावला आहे. नगररचना विभाग, इमारत निरीक्षक, बीट मार्शल, अतिक्रमण पथकामध्ये कुठलाही समन्वय नसल्यामुळे सहा प्रभागांमधील व्यावसायिक इमारतींचा वास्तविक आकडा आणि मनपाकडे असलेली नोंद यामध्ये ५ हजार मालमत्तांची तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक मालमत्तेकडून ३० ते ८० हजारांचा कर वसूल केला असता तर चार वर्षांत १०० कोटी रुपये मनपाला मिळाले असते. चार वर्षांपासून ही रक्कम कुठे गेली की वसूलच केली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. जीटीएल कंपनीच्या वीज ग्राहकांच्या आक डेवारीवरून मनपाने मालमत्ताधारकांच्या नोंदी घेण्याची तयारी सुरू केली असून, व्यावसायिक वीज मीटर किती मालमत्ताधारकांकडे आहेत, त्याचा अधिकृत आकडा आज पालिकेच्या करसंकलक विभागाला प्राप्त झाला आहे. मनपाच्या रेकॉर्डवर २२ हजार मालमत्तांची नोंद आहे, तर जीटीएलकडे २७ हजार ८०८ व्यावसायिक वीज मीटर मालमत्ताधारकांची नोंद आहे. ५ हजार ८०८ नवीन मालमत्ताचार वर्षांमध्ये ५ हजार ७०८ व्यावसायिक मालमत्तांची वाढ शहरात झाली आहे. जीटीएल ही कंपनी १ एप्रिल २०११ पासून शहरात वीज वितरणाचे काम पाहत आहे. जीटीएलने चार वर्षांत सुमारे ४० हजार नवीन वीज मीटर दिले. त्या तुलनेत मनपाकडे ४० हजार मालमत्तांची नव्याने नोंद झालेली नाही. करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले, जीटीएलच्या रेकॉर्डनुसार २७ हजार ८०८ व्यावसायिक मालमत्ता शहरात आहेत. मनपाकडे २२ हजार मालमत्तांची नोंद आहे. ५ हजार ८०८ नवीन मालमत्ता नवीन मिळणार आहेत. ३० ते ८० हजार रुपयांचा कर प्रत्येक मालमत्तेकडून मिळू शकतो. अंदाजे २५ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेचे वाढेल. दीड हजार बांधकाम परवानग्यानगररचना विभागातून दरवर्षी दीड हजार नवीन बांधकाम परवानग्या दिल्या जातात. मनपाच्या विशेष कक्षाने मागील चार वर्षांमध्ये नवीन मालमत्ता शोधून त्यांना कर लावला; मात्र अलीकडे तो कक्ष विशेष राहिलेला नाही. किती बांधकामे पूर्ण झाली. किती इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले, करसंकलक विभागाकडे त्याची माहिती वर्ग केली का, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे करवसुलीत घोळच घोळ होतात.