शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीतही सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

By admin | Updated: July 24, 2014 00:30 IST

हिंगोली : जिल्ह्याचे शिवसेनेचे नूतन संपर्कप्रमुख खा. विनायक राऊत यांच्या दौऱ्यातही शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने निष्ठावान शिवसैनिक हैराण झाले आहेत.

हिंगोली : जिल्ह्याचे शिवसेनेचे नूतन संपर्कप्रमुख खा. विनायक राऊत यांच्या दौऱ्यातही शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने निष्ठावान शिवसैनिक हैराण झाले आहेत.
जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत गटबाजी सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव झाल्यानंतर गटबाजीतील तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. या गटबाजीतूनच शिवसेनेचे दोन संपर्कप्रमुख यापूर्वी बदलण्यात आले. त्यामध्ये बबनराव थोरात हे माजी आ. गजाननराव घुगे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्याजवळचे असल्याचे कारण सांगून त्यांना बदलण्यात आले. त्यानंतर नियुक्त करण्यात आलेले सुहास सामंत हे माजी खा. सुभाष वानखेडे व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या जवळचे असल्याच्या कारणावरून त्यांना बदलण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सामंत यांच्या जागी शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर नुकतेच खा. राऊत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात पुन्हा शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला. राऊत यांच्या समोरच एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. राऊत यांच्या नर्सी फाटा येथील स्वागतापासून सुरू झालेला गटबाजीचा वाद हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत तीव्र झाला. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे राऊतही काही वेळ गोंधळले होते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील गटबाजी कमी होणार की वाढणार? अशीच चर्चा होताना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील वाद पुन्हा उफाळून आल्याने निष्ठावान शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
हिंगोली विधानसभेची शिवसेनेकडून मागणी
औरंगाबाद येथे बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, तालुकाप्रमुख कडूजी भवर, रामेश्वर शिंदे, अशोक नाईक आदींनी केली. मतदारसंघातील एकाही जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आले नसल्याने या जागेवर शिवसेनेचाच दावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.