शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करा

By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST

उस्मानाबाद : अपुरा पाऊस झाला तर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा.

उस्मानाबाद : अपुरा पाऊस झाला तर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. ज्या तालुक्यात पाणी पातळी कमी झाली आहे, अशा कळंब, परंडा, भूम आणि वाशी तालुक्यात भूजल सर्वेक्षणच्या मदतीने अभ्यास करून पाणी पातळी वाढविण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जयस्वाल यांनी पाणीटंचाई आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, विभागीय आयुक्त राम नवर, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. बैठकीत जयस्वाल यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून त्यांच्या क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा, पाऊसमान कमी झाल्यास करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती घेतली. सध्या जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत, मंडळनिहाय टँकर्सच्या खेपांची पडताळणी केली जाते का, टँकर बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहेत का, आदी बाबींची विचारणा केली.याबरोबरच जयस्वाल यांनी परंडा येथे भेट देऊन नगर परिषद पदाधिकाऱ्यांसमवेत परंडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली. कायमस्वरूपी जलस्त्रोतांसाठी व तेथून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)वीज जोडणी तोडू नकासध्याच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात यंदा चारा टंचाई जाणवणार आहे का? असा प्रश्न करीत चारा उपलब्धता किती आहे, याची माहिती त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून घेतली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तात्काळ वाटप करण्याबाबतची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात शौचालय हवेआयुक्त जयस्वाल यांनी यावेळी महसूलविषयक कामांचा आढावा घेतला. याशिवाय रोजगार हमी योजनेला निर्मल भारत अभियानशी सलग्न करून प्रत्येक गावात शंभर टक्के शौचालये असतील यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानात जिल्ह्याने चांगले काम केल्याबद्दल कौतुक करीत राजस्व अभियानातील विविध कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोंचविण्यासाठी पुढाकार घ्या, असे ते म्हणाले.