शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांची भाकर वाचविण्यासाठी आणखी मोठ्या लढाईची तयारी सुरु: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:24 IST

शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारू.

औरंगाबाद : देशात मोठमोठे गोदाम तयार केले जात आहेत. त्यात अन्नाचा मोठा साठा करून तो विकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे भाकर विकली जाईल. भाकर ही उदरनिर्वाहाची गोष्ट आहे, विकण्याची नव्हे आणि आमचा प्रयत्न ही भाकर वाचवण्याचा आहे, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी (दि. ११) औरंगाबादेत केले.

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतातील शेतकरी आणि सरकारची धोरणे’ यावर ते बोलत होते. प्रा. अंजली आंबेडकर अध्यक्षस्थानी होत्या. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

टिकैत म्हणाले, सरकार लोकांना तोडण्याचे काम करत आहे. तर, आम्हाला लोकांना जोडून ठेवायचे आहे. देशातील ५० कोटी म्हणजे ४० टक्के शेतकऱ्यांना शेतीपासून दूर नेण्याचा डाव आहे. हमीभावाचा कायदा आणायचा असून त्या कायद्यासाठी मोठ्या लढाईची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारू. त्या नव्या संघर्षासाठी तयार व्हा. त्यात तरुणाईचा सहभाग आवश्यक आहे. तो लढा शेवटपर्यंत लढू. तासाभराच्या व्याख्यानात टिकैत यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

शाहीर वसुधा कल्याणकर यांनी पोवाडा सादर केला. प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक केले. शेखर मगर यांनी सूत्रसंचालन तर तृप्ती डिग्गीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुकुल निकाळजे यांनी आभार मानले.

सरकारची सूडभावनेने कारवाईविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आदोलनात सहभागी लोकांवर सूडभावनेने केंद्र शासन धाडी टाकत आहे. विद्यार्थी, पालक, युवक आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. मात्र, विद्यापीठांत कार्यक्रम घेण्यास लोक पुढे येत नाहीत. त्यांना भीती असताना एमजीएमने पहिला कार्यक्रम घेतला. त्यामुळे आपणही कारवाईसाठी तयार राहा अशी मिश्कील कोपरखळी टिकैत यांनी मारली. मात्र, कदम यांनी आम्ही घाबरत नसल्याचे स्पष्ट केले.

वंचित, शोषितांना संरक्षण मिळावे-अंजली आंबेडकरअध्यक्षीय समारोपात अंजली आंबेडकर म्हणाल्या, कुणीच झुकवू शकत नाही, अशी प्रतिमा तयार केलेल्या सरकारला एकजूट झालेल्या शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. जेव्हा सर्वसामान्य पेटून उठतो त्याच्यासमोर कुणालाही झुकावे लागते. शेतकऱ्यांसमोर सरकारलाही असेच झुकावे लागले. या आंदोलनाने देशातील निराशेची मरगळ दूर केली. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी सरंक्षणाची होती आणि तीच समाजातील वंचित, शोषित घटकांची आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची भूमिका सर्वसामान्यांच्या कल्याणाची होती. त्या कल्याणाच्या भूमिकेवर आपणही कायम राहावे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेतीrakesh tikaitराकेश टिकैत