शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोरगरिबांची भाकर वाचविण्यासाठी आणखी मोठ्या लढाईची तयारी सुरु: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:24 IST

शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारू.

औरंगाबाद : देशात मोठमोठे गोदाम तयार केले जात आहेत. त्यात अन्नाचा मोठा साठा करून तो विकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे भाकर विकली जाईल. भाकर ही उदरनिर्वाहाची गोष्ट आहे, विकण्याची नव्हे आणि आमचा प्रयत्न ही भाकर वाचवण्याचा आहे, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी (दि. ११) औरंगाबादेत केले.

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतातील शेतकरी आणि सरकारची धोरणे’ यावर ते बोलत होते. प्रा. अंजली आंबेडकर अध्यक्षस्थानी होत्या. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

टिकैत म्हणाले, सरकार लोकांना तोडण्याचे काम करत आहे. तर, आम्हाला लोकांना जोडून ठेवायचे आहे. देशातील ५० कोटी म्हणजे ४० टक्के शेतकऱ्यांना शेतीपासून दूर नेण्याचा डाव आहे. हमीभावाचा कायदा आणायचा असून त्या कायद्यासाठी मोठ्या लढाईची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारू. त्या नव्या संघर्षासाठी तयार व्हा. त्यात तरुणाईचा सहभाग आवश्यक आहे. तो लढा शेवटपर्यंत लढू. तासाभराच्या व्याख्यानात टिकैत यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

शाहीर वसुधा कल्याणकर यांनी पोवाडा सादर केला. प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक केले. शेखर मगर यांनी सूत्रसंचालन तर तृप्ती डिग्गीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुकुल निकाळजे यांनी आभार मानले.

सरकारची सूडभावनेने कारवाईविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आदोलनात सहभागी लोकांवर सूडभावनेने केंद्र शासन धाडी टाकत आहे. विद्यार्थी, पालक, युवक आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. मात्र, विद्यापीठांत कार्यक्रम घेण्यास लोक पुढे येत नाहीत. त्यांना भीती असताना एमजीएमने पहिला कार्यक्रम घेतला. त्यामुळे आपणही कारवाईसाठी तयार राहा अशी मिश्कील कोपरखळी टिकैत यांनी मारली. मात्र, कदम यांनी आम्ही घाबरत नसल्याचे स्पष्ट केले.

वंचित, शोषितांना संरक्षण मिळावे-अंजली आंबेडकरअध्यक्षीय समारोपात अंजली आंबेडकर म्हणाल्या, कुणीच झुकवू शकत नाही, अशी प्रतिमा तयार केलेल्या सरकारला एकजूट झालेल्या शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. जेव्हा सर्वसामान्य पेटून उठतो त्याच्यासमोर कुणालाही झुकावे लागते. शेतकऱ्यांसमोर सरकारलाही असेच झुकावे लागले. या आंदोलनाने देशातील निराशेची मरगळ दूर केली. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी सरंक्षणाची होती आणि तीच समाजातील वंचित, शोषित घटकांची आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची भूमिका सर्वसामान्यांच्या कल्याणाची होती. त्या कल्याणाच्या भूमिकेवर आपणही कायम राहावे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेतीrakesh tikaitराकेश टिकैत