शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

फुलारवाडीच्या ग्रामसेवकाचा प्रताप

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

पाथरी : तालुक्यातील फुलारवाडी पाणीपुरवठा समितीला उपलब्ध झालेल्या निधीतील १ लाख १५ हजार रुपये ग्रामसेवकाने सिंगल खात्यातून परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे़

पाथरी : भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाथरी तालुक्यातील फुलारवाडी पाणीपुरवठा समितीला जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झालेल्या ५ लाख ७४ हजार रुपये निधीतील १ लाख १५ हजार रुपये ग्रामसेवकाने सिंगल खात्यातून परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे़ समितीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे़
भारत निर्माण योजनेंतर्गत पाथरी तालुक्यातील फुलारवाडी येथे तीन वर्षांपूर्वी जवळपास ४० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती़ यासाठी गावस्तरावर पाणीपुरवठा समितीही स्थापन झाली आणि त्यानंतर योजनेचे काम सुरू झाले़
समितीला मिळणारा निधी ग्रामपंचायमार्फत देण्यात येतो़ समितीच्या नावे मंजूर झालेला ५ लाख ७४ हजार ४८६ रुपयांचा धनादेश संबंधित गावचे तत्कालीन ग्रामसेवक पी़ आऱ चव्हाण यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त खात्यात जमा न करता सिंगल खात्यामध्ये जमा केला़ यातील ४ लाख ६० हजार रुपये ग्रामसेवकाने समितीकडे वर्गही केले़
यातील उर्वरित १ लाख १५ हजार रुपये रक्कम ग्रामसेवकाने स्वत:च्या स्वाक्षरीने वेगवेगळ्या तारखेमध्ये परस्पर उचलले़
हा प्रकार समितीच्या लक्षात आल्याने समितीने ग्रामसेवक पी़ आऱ चव्हाण यांच्या विरोधात पाथरी पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली़
या तक्रारीनंतर पंचायत समितीच्या वतीने पाणीपुरवठा समिती आणि ग्रामपंचायतीच्या खात्याचे उतारे काढून आणल्यानंतर ग्रामसेवकाने ही रक्कम परस्पर उचलल्याचा प्रकार निदर्शनास आला़ तक्रारी वाढल्यानंतर ग्रामसेवकाने उचललेली रक्कम समितीच्या खात्यावर भरणा करून यातून पळ काढण्याचा मार्ग शोधला़ (वार्ताहर)
सिंगल खात्यात पैसे जमा कसे?
पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात येणारा निधी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संयुक्त खात्यातूनच दिला जातो़ परंतु, येथील ग्रामसेवकाने असे न करता सिंगल खात्यामध्ये हा धनादेश जमा केला कसा? असा प्रश्न आता निर्माण झाला असून, याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे़
आज तपासणी
समितीच्या खात्यातील या रक्कमेबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण यांनी चौकशी सुरू केली आहे़ याबाबत १४ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची तपासणी करून चौकशी केली जाणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी चव्हाण यांनी दिली़
सर्वच व्यवहार सामान्य खात्यातून
पाणीपुरवठा समितीला देण्यात येणारा निधी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संयुक्त खात्यातूनच जाणे अनिवार्य असतानाही या योजनेमध्ये उपलब्ध झालेला जवळपास ३५ लाख रुपयांचा निधी ग्रामसेवकाच्या सामान्य खात्यातूनच उचलला गेला आहे़ यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे़ दरम्यान, या गावच्या ग्रामसेवकाची इतरत्र बदली झाल्याने त्याच्याकडील रेकॉर्ड मात्र चौकशी अधिकाऱ्याला वेळेत उपलब्ध होईल की नाही, याबाबत शंकाच आहे़