शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

विद्यापीठाचा स्तुत्य निर्णय; अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क केले माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:56 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपत्तीग्रस्तांना दिलासा देणारे राज्यातील पहिले विद्यापीठ 

ठळक मुद्देकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मांडला ठराव व्यवस्थापन परिषदेत झाला निर्णय  ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४२ विभाग आणि उस्मानाबाद येथील १० विभागांत शिक्षण घेत असलेल्या दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा ठराव कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला. त्यास सर्वांनुमते मंजुरी देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने कळविली आहे. या ठरावामुळे विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक शुल्क माफ होणार आहे. असा निर्णय घेणारे हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यात अगोदर दुष्काळ आणि आता अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार अजेंड्यावर नसताना कुलगुरू  डॉ. प्रमोद येवले यांनी  शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ठराव मांडला. विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील ४२ विभाग व उस्मानाबाद उपपरिसरातील दहा विभागांतील ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

बैठकीत कुलगुरू म्हणाले की, मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांवर संकट आले आहे. आपले विद्यापीठ कष्टकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणून ओळखले जाते. या मुलांसाठी ‘कमवा व शिका’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या विद्यार्थ्यांचे २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्क माफ करावे, असा ठराव मांडला. यानंतर सर्वच सदस्यांनी या ठरावाला अनुमोदन देत तो बहुमताने मंजूर केला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे म्हणाले की, आम्ही हा ठराव मांडणार होतो. मात्र, कुलगुरूंनीच अतिवृष्टीची दखल घेत ठराव मांडला, हे कौतुकास्पद पाऊल आहे. त्याचे स्वागत करतो, असे स्पष्ट केले.बैठकीला प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. भालचंद्र वायकर, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. हरिदास विधाते, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. राहुल मस्के, डॉ. नरेंद्र काळे, सुनील निकम, डॉ. अशोक देशमाने, संचालक डॉ. सतीश देशपांडे, राजेंद्र मडके, डॉ. गणेश मंझा आदींची उपस्थिती होती. 

शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणीशासन निर्णयाप्रमाणे दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार संबंधित गावांतील विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल.-डॉ. प्रवीण वक्ते, प्रकुलगुरू

सामाजिक बांधिलकीतून निर्णयभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात शोषित, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, शेतकरी समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी येतात. यावर्षी सुरुवातीला दुष्काळ आणि आता अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह इतर भागातील शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट आले आहे. या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहावे, यासाठी सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे.-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा