शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीप्रदर्शनाला फाटा !

By admin | Updated: September 26, 2014 01:45 IST

उस्मानाबाद : आजवरच्या निवडणुका पाहिल्या असता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना एकत्र करून उमेदवारी अर्ज दाखल करीत असत.

उस्मानाबाद : आजवरच्या निवडणुका पाहिल्या असता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना एकत्र करून उमेदवारी अर्ज दाखल करीत असत. या माध्यमातून उमेदवारांकडून एकप्रकारचे शक्तीप्रदर्शन केले जात असे. आणि त्यानंतर गावोगावी किमान चार-आठ दिवस शक्तीप्रदर्शनाच्याच गप्पा रंगत असत. परंतु, यावेळी याच्या उलट चित्र पहावयास मिळत आहे. विविध पक्षाच्या मातब्बरांसोबतच अपक्षांनीही शक्तीप्रदर्शनाला फाटा दिल्याचे दिसले.माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, माजी आमादार ज्ञानेश्ववर पाटील यांनी साधेपणे अर्ज दाखल केले. तर आमदार राहुल मोटे यांनी पदयात्रा काढून उमेदवारी दाखल केली. एकूणच मातब्बरांसोबतच अपक्षांनीही साधेपणाची कास धरल्याचे दिसत आहे.मागील काही दशकांतील निवडणुकीचे चित्र डोळ्यासमोर आणले असता, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या-त्या उमेदवारांकडून चार-पाच दिवस अगोदरच तयारी केली जात असे. पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावोगावी कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पाहोंचविला जात असे. त्यानंतर उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी सकाळीच गावोगावी वाहने पाठविली जात असत. या वाहनांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेवून उमेदवारांकडून शक्तीपद्रर्शन केले जात असे. जो-तो शक्तीपद्रर्शन करून एकप्रकारे आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीमध्ये याच्या उलट चित्र पहावयास मिळत आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच गुरूवारी उस्मानाबाद-कळंब या मतदार संघांतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह मोजकचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर उमरगा-लोहारा या मतदार संघातूनही विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही कसल्याही स्वरूपाचे शक्तीप्रदर्शन न करता मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. हेच चित्र परंडा विधानसभा मतदार संघामध्ये पहावयास मिळाले. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही कसल्याही पद्धतीचा गवगवा वा शक्तीप्रदर्शन न करता, आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर परंडा मतदार संघाचे विद्यमान आमदार राहुल मोटे यांनी भूम शहरातील गोलाई चौकापासून ते साहिल दूध केंद्रापर्यंत पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पदयात्रेमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी जाहीर सभा घेवून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. रासपकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनीही साधेपणाने मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)