शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बन्सी के बजैया बन्सी रे बजाओ

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

अरुण घोडे, औरंगाबाद स्वरझंकार उत्सवाची सुरुवात मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक संजीव अभ्यंकरांच्या चंद्रकौंस रागातल्या ‘पिया बिन परत नाही इक पलहु चैन’ने झाली.

अरुण घोडे, औरंगाबादप्रोझोन प्रासादात व्हायोलिन अकादमीच्या भगीरथ प्रयत्नांनी येथील उद्यम व्यापार क्षेत्रातील रसिकाश्रय दात्यांच्या मदतीने पाचव्या वर्षात पदार्पण केलेल्या स्वरझंकार उत्सवाची सुरुवात मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक संजीव अभ्यंकरांच्या चंद्रकौंस रागातल्या ‘पिया बिन परत नाही इक पलहु चैन’ने झाली. बागेश्री अंगाच्या चंद्रकौंसच्या स्वरांनी समस्त रसिक प्रासाद भारून गेला. काळजाचा ठाव घेणाऱ्या मोहक आवाजाची देन लाभलेल्या संजीव अभ्यंकरांनी ‘ले जारे जा कगरवा, पिया को संदेसवा, तरपत हूं मैं जागी सारी रतियां अजहूँ ना आये मोरे पिया’ या चीजेतील भाव रसिकांपर्यंत गाण्यातून अशा सुबोध शैलीत सादर केला की, जणू आईने लेकराला घास घास भरवावे. चंद्रकौंस रागातील बडा ख्याल व द्रुत गायिल्यानंतर त्यांनी रसिकांशी संवाद साधला. शास्त्रीय संगीत रीतसर न शिकलेल्या लोकांनाही अभिजात संगीताची आवड निर्माण होईल एवढा समर्पक हृद्य संवाद त्यांनी साधला. पूर्वार्धानंतर वेणूवादन कार्यक्रमाची नांदी देणारी चीज ‘बन्सी रे बजाओ वही राग, वही तान, वही सूर, वही गान सुनाओ, नट नागर नाचत ताथैया’ या कलावती रागातील भावावस्थेपर्यंत आधीच जाण्याचा योग रसिकांना आला. दोन अभंगांनी त्यांनी गायनाचा समारोप केला. संजीव अभ्यंकरांना संवादिनीवर साथ तन्मय देवचके, तर तालाची रंगत रोहित मुजुमदार यांनी सांभाळली. दुसऱ्या दिवसाच्या स्वरझंकारचा उत्तरार्ध वेणूबासरीचे जणू पर्यायवाची नामाभिधान लाभलेल्या पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांच्या वेणूवादनाने सुरू झाला. सुगंधी धूपदीप जळताना अगरबत्तीचा धूर मंद मंद हळुवार वळणे घेत वातावरणात विरघळून एकरूप होतो. तो सुगंधी धूर कलात्मक वळणे घेत आपल्या चित्तवृत्तींना अल्हादित करतो. तसे शब्द, अर्थाचा कसलाच झमेला नसलेले हे वेणूवादन म्हणजे विशुद्ध स्वरानंद. वेणूच्या या जादुई स्वरांना आपल्या तालावर खेळविताना पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याने रंगतदार साथ दिली. आधी राग बिहाग नंतर जैजैवंती आणि दक्षिण भारतीय राग हंसध्वनी सादर केल्यानंतर पंडितजी आणि संगतकार विजय घाटे यांची तालस्वर जुगलबंदी रसिकांची दाद मिळवून गेली. वेणूवादनाला तानपुरीची संगत सुष्मिता डव्हाळकर, तर बांसरीची संगत सोनार यांनी केली. पंडितजींचा सत्कार अनिल इरावने, रणजीतदास, एन.पी. शर्मा यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शेलार यांंनी केले.