शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलणाऱ्यांचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखते

By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे.

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे. अशा दलबदलूंचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखून आहे, अशी उपरोधिक टीका करीत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे दाखून द्या, असे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ओम गार्डन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. खा. चव्हाण म्हणाले, जनतेत पत असेल तर मते पडतात. ज्यांची पतच नाही त्यांना मत कसे पडेल. अशांना जनतेनेच बाजूला केले. त्याला अशोकराव चव्हाण जबाबदार नाहीत. जे पक्ष सोडून गेले ते बरे झाले. नव्यांना संधी मिळेल. जे चांगले काम करतील ते पुढे येतील. ५० वर्षे मेहनत घेवून तयार केलेले घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. मतांची विभागणी करण्याची खेळी भाजपा-शिवसेनेकडून होत आहे. त्यातूनच वेगवेगळ्या पक्षाचे लोक उभे केले जातील. तोच उद्योग मला पराभूत करण्यासाठी केला होता. परंतु नांदेडच्या जनतेने विकासाच्या बाजुने कौल दिला. विधानसभा २००९ च्या विजयाची पुनरावृत्ती करा. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा राज्यात फडकला पाहिजे. त्याची सुरवात नांदेडमधून करा, असे आवाहन करीत खा. चव्हाण म्हणाले, अच्छे दिन कोणाचे आले, जनतेचे नव्हे त्यांचे आले. भाजपाकडून राजकीय दहशतवाद सुरू आहे. त्यांच्याच पक्षातील लोकांवर बंधने लादली जात आहेत. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर किती गुन्हे दाखल आहेत हे आधी जनतेला सांगा, नंतर आमच्यावर आरोप करा. धर्मा-धर्मात, जाती-जातीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्ती करीत आहेत. शिर्डीचे साईबाबा देव नाहीत, असा ठराव विहिंपच्या धर्मसभेत ठराव घेण्यात आला. यातून हिंदू-हिंदुमध्ये भांडणे लावून देण्याचा उद्योग आहे. परंतु जनता हे उद्योग ओळखते. त्यांना महाराष्ट्रात योग्य धडा मिळेल आणि त्याची सुरूवात नांदेडमध्ये होईल, असा विश्वासही माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. एका विचाराने चाललो म्हणूनच विकासाची कामे दिसत आहेत. येणारा काळ सर्वसामान्यांसाठी सुरक्षित राहिला पाहिजे. यासाठी काँग्रेसला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा यांचीही भाषणे झाली. मंचावर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, मोतीराम पाटील, सभापती भुक्तरे, नगरसेवक विनय गिरडे पाटील, नवल पोकर्णा, सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, मंगलताई निमकर, सुषमा गहेरवार, शमीम बेगम, विजय येवनकर, व्यंकट मुदिराज , संगीता पाटील डक, प्रफुल्ल सावंत आदींसह जि. प., पं. स. सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)