शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

शहरवासीयांचा घसा कोरडाच; महापौरांच्या इशाऱ्यानंतरही पाणीपुरवठा जशास तसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 6:45 PM

पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही.

ठळक मुद्दे महानगरपालिका प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत.

औरंगाबाद : शहरात सर्वत्र समान पाणी वाटप झाले पाहिजे असा निर्वाणीचा इशारा ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिला होता. ११ दिवस उलटले तरी शहरात कुठेच समान पाणीवाटप झाले नाही. आजही शहरातील काही वॉर्डांना चौथ्या दिवशी, तर काहींना सहाव्या, आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. उन्हाळा संपायला आता फक्त पंधरा दिवस शिल्लक आहेत. मागील तीन महिन्यांत मनपा पदाधिकारी, प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस पाडण्यात आला. अंमलबजावणी शून्य आहे.

जायकवाडी धरणातून आजही दररोज १२० एमएलडी पाणी येत आहे. शहराची तहान बघितल्यास एवढे पाणी पुरेसे आहे. महापालिकेकडे पाणीपुरवठ्याचे अजिबात नियोजन नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यात प्रचंड ओरड पाहायला मिळत आहे. एका वॉर्डातील नागरिकांना चौथ्या दिवशी चार ते पाच तास पाणी देण्यात येते. दुसऱ्या वॉर्डात सहाव्या, आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. हा दुजाभाव दूर करून समान पाणीवाटप करा, अशी मागणी दरवर्षी उन्हाळ्यात होते. महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. नगरसेवक नागरिकांसह आंदोलन करतात.

या आंदोलनांचीही दखल आजपर्यंत प्रशासनाने घेतली  नाही. ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने पाणीपुरवठ्याची बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. आज ११ दिवस उलटले तरी पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही. महापौरांनी दिलेल्या आदेशाचे किती पालन महापालिकेत होते हे यावरून दिसून येते. महापौरानंतर पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी १० मे रोजी आयुक्तांसोबत पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या बैठकीतही समान पाणीवाटपासाठी आठ दिवसांचा अवधी प्रशासनाला देण्यात आला. १८ मे रोजी हा अवधी संपला. सिडको-हडकोसह जालना रोडवरील विविध वॉर्डांना आजही आठव्या, दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्यात आमूलाग्र सुधारणा करीत आहोत हे दाखविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही ६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पाणीपुरवठा विभागात केल्या. त्यांनी टँकरवर देखरेख ठेवावी असे सांगण्यात आले. त्यानंतरही टँकर वाटपात सुधारणा झालेली नाही. 

मुख्य वाहिनीवरील कनेक्शनशहरातील मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन काढावेत असे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत. मुख्य वाहिनीवर नळ असलेल्या नागरिकांना १३ तास पाणी मिळते. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यासाठी वॉर्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहेत. किती नागरिकांना या पथकांनी दंड आकारला याची आकडेवारीही प्रशासनाकडे नाही. 

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नाहीमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही. लाईनमन मनात येईल त्याप्रमाणे पाणीपुरवठा करीत आहेत. एखाद्या वॉर्डाला तब्बल ११ तास, तर दुसऱ्या वॉर्डाला अवघे ४५ मिनिटे पाणी देण्यात येते. हा असतोल दूर करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीagitationआंदोलनMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद