शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

दिल्ली, मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाला वाढली प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 8:31 PM

१२२ वरून १६२, आता १८२ आसनी विमान

ठळक मुद्देजेट एअरवेज बंदचा परिणाम जोरदार तिकीट विक्री, पुणे, रेल्वेचा आधार

औरंगाबाद : जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. परिणामी एअर इंडियाच्या विमानाला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. जेट बंद झाल्यानंतर एअर इंडियाचे १२२ वरून १६२ आसनी विमान येत होते. प्रवाशांची संख्या वाढतच असल्याने आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमानाचे उड्डाण होत आहे.

जेट एअरवेजच्या सकाळच्या विमानामुळे औरंगाबादकरांना मुंबईमार्गे दिल्लीची हवाई सेवा उपलब्ध होती. या कंपनीच्या विमानसेवेने सकाळच्या वेळेत मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. मात्र, २३ मार्चपासून ही विमानसेवा अचानक ठप्प झाली. जेट एअरवेजची विमानसेवा सुरू असताना पूर्वी एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान उड्डाण घेत होते; परंतु जेट बंद होताच एअर इंडियाची प्रत्येक दिवसाच्या जागा आरक्षित होणे सुरू झाले. दिवसेंदिवस प्रवाशांची मागणी वाढल्यामुळे एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठे विमान देण्याची विनंती केली होती. अखेर ५ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या १६२ आसनी विमानाने उड्डाण केले. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमान उड्डाण घेत आहे. 

जोरदार तिकीट विक्री, पुणे, रेल्वेचा आधारदिल्ली, मुंबईसाठी एकमेव विमानाचा पर्याय राहिला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी मुंबई, दिल्ली जाणाऱ्या प्रवाशांना विमानाचे बुकिंग फूल झाल्याचा अनुभव येत आहे. अशावेळी दिल्लीला विमानाने जाण्यासाठी पुणे गाठावे लागते, तर मुंबईसाठी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो; परंतु रेल्वेचे आरक्षणही मिळत नसल्यामुळे वाहनाने मुंबईला जाण्याची वेळ शहरवासीयांवर येत आहे. औरंगाबादहून दिल्ली, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या प्रमुख मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची संधी नव्या कंपन्यांना असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले.

बुकिंग : १८२ आसनी विमानाचे उड्डाणएअर इंडियाच्या विमानाचे बुकिंगदेखील वाढत आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सुविधेसाठी १६२ आसनी विमान दाखल झाले होते. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली मार्गावर १८२ आसनी विमान उड्डाण घेत असल्याची माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली. 

टॅग्स :airplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन