शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पैठणच्या उद्यानातील संगीत कारंजे बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:18 AM

येथील संत ज्ञानेश्वर उद्यानामधील संगीत कारंजे मागील दहा दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रशासनाच्या कारभाराविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : येथील संत ज्ञानेश्वर उद्यानामधील संगीत कारंजे मागील दहा दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रशासनाच्या कारभाराविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.राज्यभरातून सध्या येथे शाळेच्या सहली येत असून लहान मुलांना व पर्यटकांना आकर्षित करणारे मराठी व हिंदी चित्रपटातील गाण्याच्या तालावर नृत्य करणारे संगीत कारंजे पाहावयास मुकावे लागत आहे. संगीत कारंजे बंद असल्याने पर्यटक पैठणमध्ये मुक्कामी न थांबता परतीचा प्रवास करत आहेत.त्यामुळे पर्यटकांवर अवलंबून असलेल्या धर्मशाळा, हॉटेल्स, उपहारगृह व पैठणी साडी व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.शासनाच्या उद्देशाला हरताळशासनाने जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर म्हैसूर व वृंदावन या उद्यानाच्या धर्तीवर येथे उद्यानाची निर्मिती केली. जायकवाडी धरण पर्यटकांचे आकर्षण असल्यामुळे येथे उद्यानाची निर्मिती करून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल, असा उद्देश ठेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने संत एकनाथ महाराजांच्या जन्मभूमीत हे उद्यान सुरू करण्यात आले. पर्यटकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल आतापर्यंत शासनाच्या तिजोरीत जमा झाला. परंतु शासनाने उद्यानाला विकसित करण्यापासून नेहमीच वंचित ठेवले आहे. त्यामुळेच उद्यानाची दुर्दशा पाहायला मिळत आहे. आता तरी या तुघलकी कारभारात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा पैठणकर व पर्यटनप्रेमी करीत आहेत.येथील उद्यानाला दररोज भेट देणाºया पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यातच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शालेय सहली व पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते व त्या काळात शहरातील बाजारपेठेत चांगली उलाढाल होते. नेमक्या याच वेळी संगीत कारंजे बंद पडल्याने पर्यटक मुक्काम न करताच माघारी फिरत असल्याने याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. संगीत कारंजे लवकरात लवकर सुरू करून उद्यान अजून प्रेक्षणीय कसे बनविता येईल, यासाठी उद्यानाच्या अधिकाºयांनी तातडीने पावले उचलावीत.-पवन लोहिया, व्यापारी, पैठण

टॅग्स :musicसंगीतWaterपाणी