शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पैठण तालुक्यात ४५ हजार हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 3:06 PM

तहसील प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक पथक तयार केले आहे

ठळक मुद्देबाधित क्षेत्रापैकी ३६१२० हेक्टर क्षेत्र कापुस पिकाखालील आहे.फळबागांच्या बाधित क्षेत्राची आकडेवारी अद्याप आलेली नाही. 

पैठण : परतीच्या पावसाने पैठण तालुक्यातील ४४९७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ६३०३४ ईतक्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तहसील प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक पथक तयार केले असून शेतकऱ्यांनी शेतात उपस्थित राहून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन पैठणचे प्रभारी तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केले आहे.

पैठण तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने  प्रामुख्याने शेतातील कापुस,  सोयाबीन, बाजरी, मका व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तहसील प्रशासन व कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक नुकसान अंदाज अहवालात ४४९७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे म्हटले आहे. बाधित क्षेत्रापैकी ३६१२० हेक्टर क्षेत्र कापुस पिकाखालील आहे. सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून जवळपास १२९० हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. फळबागांच्या बाधित क्षेत्राची आकडेवारी अद्याप आलेली नाही. 

पैठण तालुक्यातील १९१ गावासाठी तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक अशा त्रीसदस्यीय पथकाची निर्मिती करण्यात आली असून पंचनाम्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी  दिली. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी पंचनामा करतांना नोंद करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केले आहे.

४० गावांचे पंचनामे पूर्ण......पैठण तालुक्यात गतीने पंचनामे करण्यात येत असून ४० गावातील बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असल्याचे तहसीलदार भारस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग