शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

उमेदवाराला अपात्र ठरविण्यासाठी ‘हयात’ अपत्यांचीच गणना व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 8:10 PM

तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्याचे प्रकरण

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना, संबंधितांना ‘अपात्र ठरविण्यासाठी’ त्यांच्या ‘हयात’ असलेल्या अपत्यांचीच गणना होणे संयुक्तिक आहे. त्यांच्या ‘मरण पावलेल्या’ अपत्यांची आणि ‘मृत जन्मलेल्या’ अर्भकांची यासाठी गणना करू नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्या. प्रसन्न बी. वराळे, न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. राजेंद्र जी. अवचट यांच्या पूर्णपीठाने दिला आहे. 

अपात्रतेसाठी तीन अपत्यासंबंधीच्या कायद्याची अंमलबजावणी १३ सप्टेंबर २००१ पासून नव्हे, तर १३ सप्टेंबर २००० पासूनच होणार असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले. यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा, महाराष्ट्र महापालिका, नगरपंचायत आणि औद्योगिक कायदा, १९६५ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यांतर्गत उमेदवारांच्या ‘अपात्रते’संबंधीची संदिग्धता दूर झाली आहे. 

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सुभाष साजेसिंग गावित यांना सहा अपत्ये असल्याच्या कारणावरून आणि त्यांची पत्नी सविता सुभाष गावित यांना तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून या दोघांचे उमेदवारी अर्ज नामंजूर केले होते. म्हणून त्यांनी अ‍ॅड. विजयकुमार सपकाळ यांच्यामार्फत खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. अ‍ॅड. सपकाळ यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सुभाषला पहिली पत्नी आशाबाई हिच्यापासून १९९० पूर्वी तीन अपत्ये झाली होती. १९९४ ला आशाबाईचे निधन झाल्यानंतर १९९६ ला सुभाषने सवितासोबत लग्न केले. सुभाषला १९९७, २००० आणि २००२ ला, अशी तीन अपत्ये झाली. मात्र, त्यापैकी २००२ ला जन्मलेल्या चेतनचे २००३ ला निधन झाले होते. त्यामुळे सुभाषला सहा आणि सविताला तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून या पती-पत्नीची नामनिर्देशनपत्रे नामंजूर केली होती. 

याचिकाकर्त्यांनी भूमिका मांडली की, एखाद्या दाम्पत्याने किती मुलांना जन्म दिला, हे महत्त्वाचे नसून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याची किती अपत्ये ‘हयात’ आहेत, हे महत्त्वाचे आहे. १३ सप्टेंबर २००० नंतर तीनपेक्षा जादा मुले होऊनदेखील ते हयात नसल्यामुळे एकही अपत्य नसताना केवळ दोनपेक्षा जादा मुले जन्माला घातल्यामुळे संबंधितांना अपात्र ठरविले जाते, ते योग्य नाही, म्हणून सदर प्रकरण पूर्णपीठाकडे वर्ग करून अपात्रतेबाबतची संदिग्धता दूर करावी, अशी विनंती केली. ‘एक सदस्यीय’ खंडपीठाच्या विनंतीनुसार मुख्य न्यायमूर्तींनी वरील ‘पूर्णपीठाची’ स्थापना केली होती.

याचिकाकर्त्याच्या वतीने पूर्णपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, काही दाम्पत्यांना ‘मृत अपत्ये’ होतात; परंतु केवळ अर्भकांचा जन्म झाला म्हणून संबंधितांना अपात्रता कायद्याखाली अपात्र ठरविण्यासाठी अशा अर्भकांचीसुद्धा गणना केली जाते, ते अयोग्य आहे.एखाद्या महिलेची किती वेळा प्रसूती झाली हे महत्त्वाचे नसून नामनिर्देशनपत्र भरताना तिची किती अपत्ये हयात आहेत, याचीच गणना व्हावी. कारण जन्मलेले अपत्य किती दिवस जगेल यावर संबंधितांचे नियंत्रण नसून, या सर्व बाबी निसर्गाच्याच अधीन आहेत. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. ए.पी. येणेगुरे यांच्याकरिता अ‍ॅड. विजयकुमार सपकाळ, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. एस.टी. शेळके, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि प्रतिवादीतर्फे अ‍ॅड. पी.डी. बचाटे आणि अ‍ॅड. इरपतगिरे यांनी काम पाहिले. 

पूर्णपीठाने या तीन मुद्यांवर दिला निर्वाळामहाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा, महाराष्ट्र  महापालिका, नगरपंचायत आणि औद्योगिक कायदा, १९६५ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यांतर्गत ‘तीन अपत्यांमुळे अपात्रतेचा कायदा २००१’ हा कायदा १३ सप्टेंबर २००० पासून लागू आहे काय.मुलांच्या जन्मानंतर त्यांचा मृत्यू झाला असला तरी संबंधिताच्या नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिवशी ती मुले हयात नसतील तरी ‘अपात्रता’ लागू होईल काय. ‘मयत’ अपत्य हे तीन अपत्यांच्या व्याख्येतून वगळता येईल काय.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादGovernmentसरकार