शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

‘औरंगाबाद’च्या नामांतराला विरोध; पुन्हा एकदा कायदेशीर लढ्याचा निश्चय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:42 IST

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नावे बदलण्याशिवाय दुसरे काम नाही का? विकासकामे संपली का? अशा शब्दांत फटकारले होते.

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय बुधवारी महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयास मुस्लिम समाजाकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला. यापूर्वी सेना-भाजप युतीने नामांतरचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यासाठी लढा देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा नामांतराची लढाई कायदेशीर मार्गानेच पुढे नेण्यात येणार असल्याचे मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी १९९५ मध्ये औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय विधानसभेत घेतला. या निर्णयाला नामांतरविरोधी कृती समितीने खंडपीठात आव्हान दिले. याचिका फेटाळून लावण्यात आली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. २००२ मध्ये याचिका निकाली काढण्यात आली. न्यायालयाने सरकारला नावे बदलण्याशिवाय दुसरे काम नाही का? विकासकामे संपली का? अशा शब्दांत फटकारले. २००१ मध्ये विलासराव देशमुख सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादसंदर्भात काढलेली अधिसूचना मागे घेतली. आता महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला. याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविल्याबद्दल मुस्लिम समाजाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

कायदेशीर लढा देणारचमुळात मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होत नाहीत. सभागृहात हा निर्णय कायद्याने घेणे अपेक्षित होते. मनोहर जाेशी यांनी सभागृहात निर्णय घेतला होता. सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना घाईगडबडीत हा निर्णय झाला आहे. याला आम्ही कायदेशीर मार्गानेच लढा देणार आहोत. आमच्या समितीची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल.- मुश्ताक अहमद, माजी नगरसेवक

नामांतरासह पॅकेजही द्यायला हवे होतेशहराचे नाव बदलण्यात काहीच अर्थ नाही. संभाजीनगर नाव केल्यानंतर काही हजार कोटींचे पॅकेज तरी शहराला द्यायला हवे होते. ज्यामुळे शहराचा चेहरामोहरा तरी बदलता आला असता. मुळात औरंगजेब हे नाव नाही. नागरिकांनी दिलेले नाव होते. ‘औरंग’ या शब्दाचा अर्थ ‘तख्त’ बसण्याची जागा असा होतो. औरंगाबाद या नावाला काही ऐतिहासिक संदर्भ आहेत. मलिक अंबर यांनी शहर वसविले. त्यांचे नाव द्यायला काही हरकत नव्हती.- रशीद मामू, माजी महापौर

न्याय व्यवस्थेवर विश्वासशहराचे नाव बदलल्याने त्याचा इतिहास बदलत नाही. यापूर्वी माझ्या वडिलांसह मी न्यायालयीन लढाई लढलो. आमचा या देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला आहे, त्या चौकटीत ही लढाई लढण्यात येईल.- खान अब्दुल मोईद हशर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMuslimमुस्लीम