शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘औरंगाबाद’च्या नामांतराला विरोध; पुन्हा एकदा कायदेशीर लढ्याचा निश्चय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:42 IST

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नावे बदलण्याशिवाय दुसरे काम नाही का? विकासकामे संपली का? अशा शब्दांत फटकारले होते.

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय बुधवारी महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयास मुस्लिम समाजाकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला. यापूर्वी सेना-भाजप युतीने नामांतरचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यासाठी लढा देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा नामांतराची लढाई कायदेशीर मार्गानेच पुढे नेण्यात येणार असल्याचे मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी १९९५ मध्ये औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय विधानसभेत घेतला. या निर्णयाला नामांतरविरोधी कृती समितीने खंडपीठात आव्हान दिले. याचिका फेटाळून लावण्यात आली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. २००२ मध्ये याचिका निकाली काढण्यात आली. न्यायालयाने सरकारला नावे बदलण्याशिवाय दुसरे काम नाही का? विकासकामे संपली का? अशा शब्दांत फटकारले. २००१ मध्ये विलासराव देशमुख सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादसंदर्भात काढलेली अधिसूचना मागे घेतली. आता महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला. याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविल्याबद्दल मुस्लिम समाजाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

कायदेशीर लढा देणारचमुळात मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होत नाहीत. सभागृहात हा निर्णय कायद्याने घेणे अपेक्षित होते. मनोहर जाेशी यांनी सभागृहात निर्णय घेतला होता. सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना घाईगडबडीत हा निर्णय झाला आहे. याला आम्ही कायदेशीर मार्गानेच लढा देणार आहोत. आमच्या समितीची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल.- मुश्ताक अहमद, माजी नगरसेवक

नामांतरासह पॅकेजही द्यायला हवे होतेशहराचे नाव बदलण्यात काहीच अर्थ नाही. संभाजीनगर नाव केल्यानंतर काही हजार कोटींचे पॅकेज तरी शहराला द्यायला हवे होते. ज्यामुळे शहराचा चेहरामोहरा तरी बदलता आला असता. मुळात औरंगजेब हे नाव नाही. नागरिकांनी दिलेले नाव होते. ‘औरंग’ या शब्दाचा अर्थ ‘तख्त’ बसण्याची जागा असा होतो. औरंगाबाद या नावाला काही ऐतिहासिक संदर्भ आहेत. मलिक अंबर यांनी शहर वसविले. त्यांचे नाव द्यायला काही हरकत नव्हती.- रशीद मामू, माजी महापौर

न्याय व्यवस्थेवर विश्वासशहराचे नाव बदलल्याने त्याचा इतिहास बदलत नाही. यापूर्वी माझ्या वडिलांसह मी न्यायालयीन लढाई लढलो. आमचा या देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला आहे, त्या चौकटीत ही लढाई लढण्यात येईल.- खान अब्दुल मोईद हशर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMuslimमुस्लीम