शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं तीस-तीस घोटाळ्यात नाव? घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:24 IST

राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्या होत्या.

औरंगाबाद: राज्यभर गाजलेल्या ३०-३० घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. याच दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव मुख्य आरोपीच्या डायरीत सापडल्याची माहिती आहे. या घोटाळ्यात आ. दानवे यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात संतोष राठोड मुख्य आरोपी आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्या होत्या. या डायऱ्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नावे आहेत. यातील एका डायरीतील यादीत आ. अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तीस-तीस घोटाळयाची कागदपत्रे ईडी ग्रामीण पोलिसांकड़ून नेली आहेत. यामुळे या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर आ. दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. 

घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांची नावतीसतीस घोटाळ्याच्या संबंधित डायरीत गुंतवणूकदारांची नावे आहेत. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे. ज्यात एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावं आहे. 

आ. अंबादास दानवे यांचा खुलासा तीस-तीस घोटाळ्यात आ. अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा समोर आली. याबाबत एका वृत्त वाहिनीने आ. दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. 'त्या डायरीत माझं नाव नाही, कोणी दुसरा दानवे असेल.' असा खुलास दानवे यांनी केला आहे. 

काय आहे तीस-तीस घोटाळा.?मराठवाड्यात समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसी या प्रकल्पांमुळे कोट्यवधी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला होता. हेच लक्षात घेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने या शेतकऱ्यांना माझ्याकडे पैसे गुंतवा आणि मासिक ३० टक्के परतावा मिळावा अशी योजना आणली. सुरवातीला काही नातेवाईकांना या योजनेत घेऊन त्यांना चांगला परतावा दिला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी यात पैसा गुंतवला. यातून करोडेंची माया राठोडने जमा केली. मात्र, काही दिवसांनी राठोडने व्याज देणे बंद केले. त्यानंतर अनेकांनी गुंतवणूक परत मागितली तर पैसे देखील परत करण्यात आले नाही. यामुळे अखेर राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय