शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ संघच सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:17 IST

देशभरात सध्या असुरक्षितेचे वातावरण आहे. अल्पसंख्यांक, महिला, शेतकरी, कामगार, युवक, मीडिया सगळेच त्रस्त आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरात सध्या असुरक्षितेचे वातावरण आहे. अल्पसंख्यांक, महिला, शेतकरी, कामगार, युवक, मीडिया सगळेच त्रस्त आहेत. भाजपा सरकारमुळे देशात फक्त राष्टÑीय स्वयंसेवक संघच सुरक्षित आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ आझाद यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, खा. रजनी पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक उपस्थित होते.इंदिराजींच्या आठवणींना उजाळा देत, निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता लढण्यासाठी सज्ज राहाण्याचे आवाहन आझाद यांनी काँग्रेसजनांना केले.गांधीजींची टोपी ही स्वातंत्र्याची निशाणी आहे. आरएसएसची टोपी काळी आहे. सध्या देशावर काळ्या इंग्रजांचे राज्य चालू आहे. ते लुटण्यासाठीच आले आहेत, अशी टीका महाराष्टÑाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचेही भाषण झाले.>भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळप्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, ‘नुकताच ९ आॅगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी इंग्रजांना ‘चले जाव’ म्हणावे लागले होते. आता भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. आज इंदिराजींना बदनाम करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातूनसुद्धा होत आहे, पण तो पाहायला कुत्रंही गेलं नाही.महाराष्टÑात जाहीर केलेली शेतकºयांची कर्जमाफी कागदावरच असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. कर्जमाफी मिळाली का, असे त्यांनी विचारले असता, कुणीही हात वर केला नाही. सरकार फक्त जाहिराती देऊन भूलभुलैया करीत आहे, असे ते म्हणाले.ज्यांची डोकी स्वच्छ नाहीत, ज्यांचे विचार स्वच्छ नाहीत, ते भारत स्वच्छ करू शकत नाहीत. आपल्याकडे इंदिरा गांधींचा वैचारिक वारसा आहे. तो वारसा जपत, आपण खरेदी-विक्री संघ झालेल्या भाजपाला हुसकावून लावले पाहिजे. गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्या विजयाने तशी सुरुवात झाल्याचे चव्हाण म्हणाले.शरद पवार ‘संपुआ’बरोबरचदिल्लीत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला राष्टÑवादीचे नेते शरद पवार अनुपस्थित होते, याकडे लक्ष वेधता, मी पवारांना त्या दिवशी फोनद्वारे संपर्क साधला होता, परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत; पण ते यूपीएबरोबरच आहेत, असर आझाद यांनी सांगितले.>आश्वासनांचा विसरकेंद्र सरकारचा कारभार टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुरू आहे. मोदींना निवडणूक काळातील आश्वासनांचा विसर पडला आहे. देशभर गोरक्षकांचा धुमाकूळ सुरू आहे. नोटाबंदीमुळे कंबरडे मोडलेले असताना, जीएसटी आल्याने सर्वसामान्यांवर बोजा पडला, असेही आझाद म्हणाले.