शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात ६४० नागरिकांमागे केवळ एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात २०१८ मध्ये तीन जातीय दंगली झाल्या. यामुळे संपूर्ण शहर ढवळून निघाले होते. वाळूज, पंढरपूर, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन ...

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात २०१८ मध्ये तीन जातीय दंगली झाल्या. यामुळे संपूर्ण शहर ढवळून निघाले होते. वाळूज, पंढरपूर, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन या जुन्या औद्योगिक वसाहतींसोबत शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत २० वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. औद्योगिकदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असलेल्या औरंगाबाद आता सामाजिक आणि राजकीय चळवळीचे केंद्र बनले आहे. सीमी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा तळ म्हणून औरंगाबादकडे सुरक्षा यंत्रणा पाहात होत्या. आता शहराची लोकसंख्या आणि विस्तार वेगाने होत असल्यामुळे गुन्हेगारीही तितक्याच वेगाने वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या तुलनेत मात्र शहर पोलिसांची संख्या वाढली नाही. शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर ३ हजार ६५० पोलीस बल आहे. असे असले तरी यातील रोज सरासरी ३०० ते ४०० कर्मचारी रजेवर आणि तेवढेच पोलीस साप्ताहिक सुटीवर असतात.

पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामे करण्यासाठी तैनात पोलीस कर्मचारी यांची संख्या १०० च्या आसपास असते. शिवाय प्रत्येक ठाण्यातील कार्यालयीन कामकाज पाहण्यासाठी सुमारे ३० ते ३५ कर्मचारी लागतात. या सर्व बाबींचा विचार करून दिवस आणि रात्रपाळीचे काम करण्यासाठी केवळ २ हजार ५०० हून कमी पोलीस उपलब्ध होतात. यावरून शहरातील लोकसंख्येचा विचार करता ६४० लोकसंख्येमागे केवळ एक पोलीस कार्यरत असल्याचे दिसून येते.

==================

चौकट

महिला अत्याचार, मंगळसूत्र चोरी वाढती

कोविड संसर्गामुळे गतवर्षी शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी कमी दिसत असली, तरी २०१९ आणि त्यापूर्वीच्या वर्षातील महिला अत्याचार, विनयभंग आणि मंगळसूत्र चोरीसारख्या घटना वाढलेल्या आहेत. शिवाय मंगळसूत्र चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस कमी पडत आहेत.

=============

केवळ ३२ टक्के गुन्हे उघडकीस

शहरातील गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ ३२ ते ३३ टक्के आहे. वाहनचोरी, घरफोडीच्या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.

===============

व्हीआयपी दौऱ्याचा बंदोबस्ताचा ताण

शहरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वर्षभर व्हीआयपी व्यक्ती आणि सभा, समेलन तसेच आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्त करावा लागतो. या ताणाचा दुष्परिणाम पोलिसांवर होत असतो. यातून पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना रजा मिळत नाही आणि त्यांना साप्ताहिक सुटीच्या दिवशीही कामावर यावे लागते.