शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

घाटी रुग्णालयात अवघा ७५ रक्तपिशव्यांचा साठा, मतदानाआधी रक्तदानाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 19:46 IST

अन्य रक्तपेढ्यांमध्ये तुटवडा : कुठे एक दिवस, तर कुठे दोन-तीन दिवस पुरेल इतका रक्तसाठा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सुट्या आणि त्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीने रक्तदात्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे शहरातील काही रक्तपेढ्यांमध्ये एक दिवस, तर काही रक्तपेढ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. एकट्या घाटीतील विभागीय रक्तकेंद्रात अवघ्या ७५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मतदानाआधी रक्तदान करा, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.

शहरात १० रक्तपेढ्या असून, दिवाळी सुट्यांमध्ये दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. सुट्यांमुळे नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी गावी जातात. यावर्षी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही निवडणुकीत गुंतले आहेत. परिणामी, दात्यांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्यावर झाला आहे. घाटी रुग्णालयात दररोज १२०० ते १५०० रुग्ण दाखल असतात. अशा परिस्थितीत येथील रक्तपेढीत केवळ ७५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत.

जिल्हा रुग्णालयात १८ पिशव्याजिल्हा रुग्णालयातील रक्त केंद्रात सध्या १८ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. रक्तदान शिबिराची आवश्यकता असून, नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे.- डाॅ. अपर्णा जक्कल-दिकोंडवार, रक्तपेढीप्रमुख, जिल्हा रुग्णालय

रक्तदानासाठी पुढे यासध्या दररोज स्वेच्छेने रक्तपेढीत येऊन जवळपास १० जण रक्तदान करीत आहेत. सध्या तशी रुग्णसंख्या कमी असून, ३ ते ४ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. लवकरच मोठे रक्तदान शिबिर होणार आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गरजू रुग्णांसाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावे.- डाॅ. भारत सोनवणे, प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभाग, घाटी

दोन ते तीन दिवसांचा साठादिवाळी सुट्यांमुळे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. लायन्स रक्तपेढीत ६० रक्तपिशव्या आहे. या दोन ते तीन दिवस पुरतील. दररोज २५ ते ३० पिशव्यांची मागणी असते. तरी जागरूक नागरिकांनी रक्तदान शिबिरे घेऊन गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे.- शामराव सोनवणे, लायन्स ब्लड सेंटर

एक दिवस पुरेल इतका साठासध्या एक दिवस पुरेल इतका साठा आहे. रक्तदात्यांना बोलावून रक्ताची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण नियमित रक्तदान शिबिरे सुरु झाल्याशिवाय ही टंचाई दूर होणार नाही. सध्या ६० रक्त पिशव्या आहेत.- आप्पासाहेब सोमासे, दत्ताजी भाले रक्तपेढी

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर