शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

काळाचा घाला ! वृद्ध पित्याला द्यावा लागला तरुण मुलांच्या जनाजाला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 6:57 PM

एकाच कुटुंबातील ३ मुलांचा करुण अंत झाल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

ठळक मुद्देमृतांपैकी चार मुले हे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. एकाचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु होते

करमाड : कोबी काढण्याच्या कामासाठी नाथनगर वडखा येथे गेलेल्या ५ तरुणांचा पाझर तलावात बुडून शुक्रवारी मृत्यू झाल्याचे कळताच भालगावात शोककळा पसरली होती. वृद्ध पित्याला आपल्या तरुण मुलांच्या जनाजाला खांदा देण्याची वेळ आल्याचे दृश्य पाहून गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. 

एकाच कुटुंबातील ३ मुलांचा करुण अंत झाल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या मृत तरुणाचे वडील युसूफ शेख हे टेम्पोचालक असून, पत्नी व ५ मुलांसह भालगाव येथे राहतात. टेम्पो चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, तर इतर दोन्ही मृतांना प्रत्येकी एक भाऊ आहे. सध्या लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने व बकरी ईदनिमित्त कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी पाचही तरुण कोबी काढण्याच्या कामासाठी शुक्रवारी नाथनगर वडखा येथे गेले आणि तलावात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आक्रोशामुळे गावातील सर्वांचेच हृदय हेलावले. या दुर्दैवी घटनेबद्दल आ. हरिभाऊ बागडे यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले. 

मृतांपैकी चार जण महाविद्यालयीन विद्यार्थीमृतांपैकी चार मुले हे चित्तेपिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शेख समीर व शेख अन्सार हे याचवर्षी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. सोहेल युसूफही दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता, तर अतिक हाही याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, सध्या त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादdrowningपाण्यात बुडणे