शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

२००५ पासून वाढतेय महिला पोलिसांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:23 AM

पोलिसांचे क्षेत्र हे फक्त पुरुषांसाठीच असते. महिला त्या क्षेत्रात टिकाव धरू शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी सर्रास बोलले जायचे. आजही काही लोकांचा हा समज आहे. मात्र २००५ पासून महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय वाढली असल्याचे दिसून येते. यामध्येही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देमहिला सक्षमता : महाराष्ट्र पोलीस वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रात ग्रामीण भागातील मुली ठरताहेत अव्वल

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलिसांचे क्षेत्र हे फक्त पुरुषांसाठीच असते. महिला त्या क्षेत्रात टिकाव धरू शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी सर्रास बोलले जायचे. आजही काही लोकांचा हा समज आहे. मात्र २००५ पासून महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय वाढली असल्याचे दिसून येते. यामध्येही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.२०१५ साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात जास्त महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलात महिलांना देऊ केलेले तीस टक्के आरक्षण हा यामागचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात. मात्र नोकरी मिळाल्यानंतरही महिलांमध्ये मुळातच असलेली जिद्द आणि कामाप्रतीची निष्ठा, यामुळे या क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा जास्त टिकाव धरू शकतात, असे बोलले जाते. महाराष्ट्रातील महिला पोलिसांचे प्रमाण एकूण पोलीस संख्येच्या १०.४८ टक्के एवढे आहे. यातही महिला पोलीस अधिकाºयांपेक्षा पोलीस कर्मचाºयांंची संख्या अधिक आहे. हे गुणोत्तर १:२३ एवढे जास्त आहे. पोलिसांची नोकरी त्रासदायक असते, वेळा निश्चित नसल्याने महिला ती नोकरी करून कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. प्रचंड धावपळ असल्याने महिलांना पोलीस क्षेत्रात काम करणे अवघड जाते, त्यामुळे अनेकदा पालकही आपल्या मुलीला या क्षेत्रात येऊ देण्यासाठी फारसे खुश नसतात. मात्र आता आत्मविश्वासपूर्वक कार्य करणाºया महिला पोलिसांकडे पाहून अनेक पालकांचे आणि युवतींचे मतपरिवर्तन होत असून, या क्षेत्रातील युवतींची संख्या वाढते आहे.महिलांसाठी उत्तम करिअरमागच्या काही वर्षांपासून पोलीस दलात भरती होणाºया महिलांचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. या क्षेत्रात काम करणाºया महिलांकडे पाहून हे क्षेत्र दिसते तेवढे खडतर नसल्याचे मुलींना कळते. त्यामुळे त्यांच्या मनातील गैरसमज साहजिकच दूर होतो. महिलांसाठी हे एक चांगले क रिअर ठरत आहे.- वैशाली धाटे- घाटगे, पोलीस उपायुक्तग्रामीण भागातील मुली अव्वलग्रामीण भागातील अनेक मुली आज महिला पोलीस म्हणून सक्षमपणे कार्य करीत आहेत. शारीरिक श्रम करण्याची सवय असल्यामुळे शहरी मुलींपेक्षा ग्रामीण भागातील मुली अधिक काटक असतात. त्यामुळे निवड प्रक्रियेदरम्यान असलेल्या शारीरिक क्षमता चाचणीत फारसे श्रम न घेताही त्या अव्वल ठरतात. या क्षेत्रात अजूनही मुलींना भरपूर वाव आहे.- वैशाली पाटील, संचालिका, पोलीस- सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था