शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आता महाविद्यालये,विद्यापीठांमध्ये सारखाच अभ्यासक्रम,परीक्षा पॅटर्न;येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:40 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university यूजीसी व नॅकच्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठातील विभागांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम राबविली.

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad) सर्व शैक्षणिक विभाग आणि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा सिलॅबस, परीक्षा पॅटर्न एकसमान राबविण्याचा निर्णय मंगळवारी विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठातील डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. वाल्मीक सरवदे यांनी मुद्दा निदर्शनास आणून दिला की, ‘नॅक’च्या मूल्यांकनप्रसंगी गुणांमध्ये वाढ होण्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभागांनी शैक्षणिक लवचिकता देण्याचे धोरण कायम ठेवणे हिताचे राहील. यूजीसी व नॅकच्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठातील विभागांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम राबविली. त्यानुसार सन २००५ मध्ये विभागांना शैक्षणिक लवचिकता देण्यात आली होती, ती विद्या परिषदेने २७ जुलै २०२१ रोजी बैठकीत काढून घेतली. ती यापुढे राबविण्यात यावी. मात्र, या मुद्यास बहुमताने विरोध झाला. विद्यापीठ व विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत सर्व महाविद्यालयांचा यापुढे एकसमान अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतही एकसमान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्यवस्थापन परिषदेकडून पुन्हा यावेळी गाईडसाठी पीएच.डी. झाल्यानंतर तीन वर्षांची अट रद्द करण्यात यावी, या निर्णयासही विरोध झाला. प्रोफेसर, असोसिएटेड प्रोफेसर यांचा अध्यापनाचा अनुभव दांडगा असल्यामुळे त्यांना पीएच.डी. झाल्यानंतर तीन वर्षे व पाच शोधनिबंध प्रसिद्ध झाले पाहिजे, ही अट राहणार नाही. मात्र, असिस्टंट प्रोफेसरसाठी ही अट लागू राहील, या मतावर विद्या परिषदेचे सदस्य ठाम राहिले. याशिवाय, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना गाईडशीप देऊ नये, असे काही सदस्यांचे म्हणणे होते. त्यास कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विरोध केला, तर डॉ. सरवदे यांनी असा निर्णय घेता येणार. अनेक विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे २५ वर्षांपासून गाईडशीप आहे, हा मुद्दा निदर्शनास आणून दिला.

पायाभूत सुविधा नाहीत, तर संलग्नीकरण नाहीकाही नवीन महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नाहीत. शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीने नवीन महाविद्यालयांसाठी बिंदू निश्चित केले होते. त्याची पायमल्ली करीत काही राजकारण्यांनी नवीन महाविद्यालये मिळविली. तरीही अशा महाविद्यालयांना कुलगुरुंनी संलग्नीकरण कसे दिले, यावर सदस्यांनी गोंधळ घातला. तेव्हा शासनाने आपल्या अधिकारात मंजुरी दिली, तर विद्यापीठ कायदा कलम १२/७ च्या अधिकारात आपण पहिल्या वर्षासाठी संलग्नीकरण दिले. यापुढे अशा महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधांची तपासणी करूनच संलग्नीकरण दिले जाईल, असे कुलगुरु डॉ. येवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण