शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'आता भारत सरकारने 'हर घर संविधान' अभियान राबवावे', जेष्ठ पत्रकार मंगल खिंवसरा यांनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:48 IST

'2025ला संविधानाचा अमृत महोत्सव आहे, त्यावेळी सरकारने 'हर घर संविधान'देऊन संविधानिक मूल्य बळकट करावेत.'

औरंगाबादआम्ही देशाच्या संविधानिक आणि लोकशाही मूल्यांचे तत्वतः पालन करणारे आंबेडकर अनुयायी आहोत. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा'चे आम्ही स्वागतच केले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले भारतीय संविधान नसते तर या राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नसता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता साजरा झालाय, 2025 दरम्यान संविधानाचा अमृत महोत्सव आहे. त्यावेळी सरकारने 'हर घर संविधान'देऊन संविधानिक मूल्य बळकट करावेत, अशी अपेक्षा आंबेडकरी चळवळीच्या नेत्या तथा जेष्ठ पत्रकार मंगल खिंवसरा यांनी (15 ऑगस्ट) व्यक्त केली.

संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष माधवराव बोरडे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (१५ ऑगस्ट) भीमनगर येथील माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या संपर्क कार्यालयात नेत्रचिकीत्सा शिबीर व चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष विठाबाई बोरडे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगदीशचंद्र वठार, माजी नगरसेवक प्रेमलता दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी दहा वाजता नंदनवन कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ अभिवादन सभा झाली. 

महात्मा फुले चौकात सकाळी अकरा वाजता ७४ रोपे लावण्यात आली. त्यानंतर शिबिराचे उदघाट्न झाले. त्यावेळी खिंवसरा म्हणाल्या, ' सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आपण वाचन बंद केल्यामुळे आपल्या चळवळीसमोर नवे आव्हाने उभी राहिली आहेत. बालपनापासूनच वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर आपल्याला बाल ग्रंथालये सुरू करावे लागतील. बोरडे प्रतिष्ठानतर्फे सातत्याने लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. प्रतिष्ठाननेच यापुढे सरकारच्या आधी  'हर घर संविधान' आणि बाल ग्रंथालय सुरू करावेत, असे आवाहनही खिंवसरा यांनी केले. बोधिपालो महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. डॉ. यशवंत कांबळे, ऍड. धनंजय बोरडे, कडुबा तुपे, शेख अफसरभाई, प्रशांत इंगळे, मुकुल निकाळजे, ऍड. अमोल घोबले,  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न  केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादConstitution Dayसंविधान दिन