शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आता वाहतूक नियम तोडणाऱ्यांना देणार ई-चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:44 IST

दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे. 

- बापू सोळुंके

औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना एप्रिलपासून थेट ई-चालान मिळणार आहे. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वॅप करून वाहनचालकांकडून ई-चालानच्या माध्यमातून दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक  कारवाई केली जाते. वाहनचालकांना कागदी चालान देऊन वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठवून तेथे दंड भरून घेतला जाते. दंड भरल्याची पावती पोलिसांकडून वाहनचालकाला  मिळते. ही पावती दाखविल्यानंतर कारवाई करणारे पोलीस जप्त लायसन्स परत करतात. यासोबतच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आणि मोबाईलवर छायाचित्र काढून घरपोच दंडाची पावती पाठविण्याचे कामही सेफ सिटी विभागाकडून सुरू आहे.

घरपोच पावती प्राप्त झाल्यानंतर बँकेत अथवा पोस्ट कार्यालयात दंड भरण्याची व्यवस्था करण्यात आली. असे असले तरी शासनाने मात्र आता कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य दिले आहे. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कमही आता ई- चालान पद्धतीने भरून घ्यावी, असा आदेश पोलीस महासंचालकांनी दिला. त्यानुसार सोमवारपासून शहर वाहतूक विभागातील सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस शिपाई यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून दंडाची रक्कम ई-चालान पद्धतीने वसूल केली जाणार आहे. वाहनचालकांकडून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड स्वॅप करून दंड भरून घेतला जाणार आहे.

काय असेल ई-चालानमध्येवाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर ई-चालान यंत्रात वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचा लायसन्स क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, वाहतूक नियम मोडल्याचे ठिकाण, तारीख आणि ठिकाण याबाबतची माहिती वाहतूक पोलीस टाकतील. ही माहिती ई-चालान सॉफ्टवेअरमध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवली जाईल. यामुळे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा वाहतूक नियम मोडले हे एका क्लिकवर समजणार आहे.   

उद्यापासून होणार अंमलबजावणीपोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, १ एप्रिलपासून ई-चालानची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, ११ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३२० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दोन दिवसांत पूर्ण होईल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादtraffic policeवाहतूक पोलीस