शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

आता वाहतूक नियम तोडणाऱ्यांना देणार ई-चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:44 IST

दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे. 

- बापू सोळुंके

औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना एप्रिलपासून थेट ई-चालान मिळणार आहे. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वॅप करून वाहनचालकांकडून ई-चालानच्या माध्यमातून दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक  कारवाई केली जाते. वाहनचालकांना कागदी चालान देऊन वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठवून तेथे दंड भरून घेतला जाते. दंड भरल्याची पावती पोलिसांकडून वाहनचालकाला  मिळते. ही पावती दाखविल्यानंतर कारवाई करणारे पोलीस जप्त लायसन्स परत करतात. यासोबतच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आणि मोबाईलवर छायाचित्र काढून घरपोच दंडाची पावती पाठविण्याचे कामही सेफ सिटी विभागाकडून सुरू आहे.

घरपोच पावती प्राप्त झाल्यानंतर बँकेत अथवा पोस्ट कार्यालयात दंड भरण्याची व्यवस्था करण्यात आली. असे असले तरी शासनाने मात्र आता कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य दिले आहे. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कमही आता ई- चालान पद्धतीने भरून घ्यावी, असा आदेश पोलीस महासंचालकांनी दिला. त्यानुसार सोमवारपासून शहर वाहतूक विभागातील सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस शिपाई यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून दंडाची रक्कम ई-चालान पद्धतीने वसूल केली जाणार आहे. वाहनचालकांकडून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड स्वॅप करून दंड भरून घेतला जाणार आहे.

काय असेल ई-चालानमध्येवाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर ई-चालान यंत्रात वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचा लायसन्स क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, वाहतूक नियम मोडल्याचे ठिकाण, तारीख आणि ठिकाण याबाबतची माहिती वाहतूक पोलीस टाकतील. ही माहिती ई-चालान सॉफ्टवेअरमध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवली जाईल. यामुळे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा वाहतूक नियम मोडले हे एका क्लिकवर समजणार आहे.   

उद्यापासून होणार अंमलबजावणीपोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, १ एप्रिलपासून ई-चालानची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, ११ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३२० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दोन दिवसांत पूर्ण होईल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादtraffic policeवाहतूक पोलीस