लोहारा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहर व परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोहारा पोलिसांनी राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १४९ प्रमाणे नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये २८ जणांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत. दरम्यान, निकाल लागल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकार्यांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य केले जाऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. लोहारा शहर व परिसराती जेवळी, माकणी येथील राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. काही प्रकार वा अनुचित कृत्य घडल्यास संबंधित २८ पदाधिकार्यांना जबाबदार धरले जाणार आहे. (वार्ताहर) कोणत्याही गुन्ह्यात पुरावा म्हणून ग्राह्य दगडफेक अथवा सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास व मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. सदरील नोटीस ही कोणत्याही घटनेसंदर्भातील गुन्ह्यामध्ये पुरावा मानला जाणार आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या नोटिसीत नमूद कण्यात आले आहे.
२८ जणांना नोटीस
By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST