शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अनिवासी भारतीयांना अभियांत्रिकी प्रवेशाच्या नोंदणीसाठी द्यावे लागतात १ लाख रुपये

By राम शिनगारे | Updated: July 24, 2025 19:45 IST

मागील वर्षीच्या तुलनेत दसपट शुल्कामध्ये वाढ; शुल्क कमी करण्याची पालकांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी नागरिकांच्या मुलांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बारावीची परीक्षा दिली आहे. या अनिवासी भारतीय (एनआरआय) विद्यार्थ्यांना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘पीसीएम’ ग्रुपच्या टक्केवारीच्या आधारावर प्रवेश मिळतो. त्यासाठी सीईटी सेलकडे नाेंदणी सुरू असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सीईटी सेलने तब्बल दसपट शुल्क वाढवीत १ लाख रुपये केले आहे. प्रवेश झाला नाही तर हे शुल्कही परत मिळत नसल्यामुळे आखाती देशातील शेकडो पालक चिंतेत आहेत. त्यांनी याविषयी मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री, सचिवांसह सीईटी सेलकडे तक्रार नोंदविली. मात्र, त्यास कोणीही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती ओमानमधील डॉ. राहुल देहेदकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

महाराष्ट्रात सीईटी सेलतर्फे घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठीची नोंदणी सुरू आहे. त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवरील जेईई परीक्षेच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. मूळचे महाराष्ट्रातीलच; पण देशाबाहेरून सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलच्या पोर्टलवरून एआरआय/सीआयडब्ल्यूजी/ फॉरेन कोटामधून प्रवेशासाठी नोंदणी करता येते. या नोंदणीच्या लॉगीनसाठी ५० डॉलर आणि अर्ज कन्फर्मसाठी ११५० डॉलर शुल्क आकारण्यात येत आहे. भारतीय चलनात हे शुल्क तब्बल १ लाख रुपये होत असून, ते नॉन रिफंडेबल आहे. त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर जेईईसाठी हे शुल्क केवळ ३०० डॉलर म्हणजेच २५ हजार रुपये आहे. एमएचटी सीईटी पोर्टलवर एकदा नोंदणी केल्यानंतर पुन्हा प्रवेश घेतला किंवा नाही घेतला तरीही हे शुल्क परत मिळत नाही. परदेशात नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रवासीयांवर हा अन्याय असल्याची तक्रार ४०० पेक्षा अधिक पालकांनी राज्य शासनाच्या विविध यंत्रणांकडे नोंदवली. मात्र, त्याची दखल कोणीही घेतली नाही. याविषयी सीईटी सेलशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

२० हजारांवर विद्यार्थी देतात परीक्षाआखाती देशात वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीयांची २० हजारांवर मुले सीबीएसईची बारावीची परीक्षा देतात. त्यात १० टक्क्यांवर विद्यार्थी महाराष्ट्रीय असल्याचा दावा डॉ. देहेदकर यांनी केला आहे. त्यातील ४०० ते ५०० पालकांनी राज्य शासनाकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडून दखलराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी अनिवासी भारतीयांच्या मागणीची दखल घेत राज्य शासनाकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली. कर्नाटक राज्यात ५५ हजार रुपये शुल्क असून, ते परतही मिळते. त्या पद्धतीचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशी मागणीही खा. सुळे यांनी केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर