शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

ना लखलखता प्रकाश, ना दिव्यांची आरास; आमची दिवाळी असते रानावनात मेंढ्यांच्या कळपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:10 IST

उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जाते

ठळक मुद्देजुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!

- रघुनाथ सावळेउंडणगाव : दिवाळी म्हटले की, आनंदाचा महोत्सव शहर असो की गाव, सगळीकडे आनंदाला उधाण आलेले असते. मात्र, पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या व गावोगाव मेंढ्या घेऊन भटकंती करणारा धनगर समाज या आनंदापासून वर्षानुवर्षे वंचित आहे. 

गाव सोडून रानावनात मेंढ्यांच्या सान्निध्यातच त्यांची दिवाळी पार पडते. ना फटाके ना नवीन कपडे, ना लखलखता प्रकाश ना दिव्यांची आरास. उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जातेही, मेंढरे व आपले काम भले यातच जीवन व आनंद सामावलेला असल्याचे ते आजही समजतात. दिवाळीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये काही दिवसांपासून धामधूम सुरू आहे. २१ व्या शतकातील मनुष्य हा चंद्रावर जाऊन आला आहे. जगामध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडू लागल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोंडीपासून मागासलेल्या ‘धनगर’ समाज आजही कोसोदूर आहे. त्यांना जगाशी काहीही घेणे- देणे नाही. दिवाळी व पाडवा सणानिमित्त सर्वत्र आनंद संचारलेला असताना नेहमी जंगलात जीवन जगणाऱ्या मागासलेल्या ‘धनगर’ समाजाचे सर्व दिवस हे सारखेच असतात.

उघड्या रानावनात चूल पेटली की, त्या प्रकाशात जेवण करून घेणे व नंतर अंधारातच मेंढरांचा संभाळ करणे यातच ‘अपुलं जीवन - मरण समावलेलं आहे रं गड्या....!’ असे म्हणून धनगर समाजाचे मेंढपाळ हे दिवाळी सण साजरा करीत असतात. प्रवाहापासून कोसोदूर असलेल्या  धनगर समाजाने आता एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. मात्र, या लढाईत शिकलेला किंवा एकाच ठिकाणी स्थायी झालेले समाजबांधवच पुढाकार घेत आहेत. रानावनात मेंढ्या घेऊन भटकणारा समाज आजही यापासून खूप दूर आहे. आमच्या समाजात नेमका ‘प्रकाश’ कधी पडेल, असा प्रश्न आता या समाजातील शिकलेले तरुण व्यक्त करू लागले आहेत. 

जुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!दिवाळीनिमित्त सर्वच जण नवीन कपडे घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, आमच्या नशिबी आठराविश्वे दारिद्र्य व नीट पोटाला भाकरही मिळत नाही. आमच्या अनेक लेकरांचे बालपणही मेंढरांसोबतच रानावनात जाते. अनेक दिवस नातेवाईक भेटत नाहीत. अंगावरील फाटक्या कपड्यांना ठिगळांचा आधार दिलेला असतो. आमची दिवाळी ही अशीच येते आणि जाते. संपूर्ण आयुष्यात ऐशआराम, लखलखाट काय असतो, याच्या जवळ कधीच गेलो नाही. अशी खंत या समाजातील बाळू शंकर सावळे या मेंढपाळाने व्यक्त केली.

टॅग्स :forestजंगलDiwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबाद