शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

ना लखलखता प्रकाश, ना दिव्यांची आरास; आमची दिवाळी असते रानावनात मेंढ्यांच्या कळपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:10 IST

उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जाते

ठळक मुद्देजुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!

- रघुनाथ सावळेउंडणगाव : दिवाळी म्हटले की, आनंदाचा महोत्सव शहर असो की गाव, सगळीकडे आनंदाला उधाण आलेले असते. मात्र, पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या व गावोगाव मेंढ्या घेऊन भटकंती करणारा धनगर समाज या आनंदापासून वर्षानुवर्षे वंचित आहे. 

गाव सोडून रानावनात मेंढ्यांच्या सान्निध्यातच त्यांची दिवाळी पार पडते. ना फटाके ना नवीन कपडे, ना लखलखता प्रकाश ना दिव्यांची आरास. उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जातेही, मेंढरे व आपले काम भले यातच जीवन व आनंद सामावलेला असल्याचे ते आजही समजतात. दिवाळीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये काही दिवसांपासून धामधूम सुरू आहे. २१ व्या शतकातील मनुष्य हा चंद्रावर जाऊन आला आहे. जगामध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडू लागल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोंडीपासून मागासलेल्या ‘धनगर’ समाज आजही कोसोदूर आहे. त्यांना जगाशी काहीही घेणे- देणे नाही. दिवाळी व पाडवा सणानिमित्त सर्वत्र आनंद संचारलेला असताना नेहमी जंगलात जीवन जगणाऱ्या मागासलेल्या ‘धनगर’ समाजाचे सर्व दिवस हे सारखेच असतात.

उघड्या रानावनात चूल पेटली की, त्या प्रकाशात जेवण करून घेणे व नंतर अंधारातच मेंढरांचा संभाळ करणे यातच ‘अपुलं जीवन - मरण समावलेलं आहे रं गड्या....!’ असे म्हणून धनगर समाजाचे मेंढपाळ हे दिवाळी सण साजरा करीत असतात. प्रवाहापासून कोसोदूर असलेल्या  धनगर समाजाने आता एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. मात्र, या लढाईत शिकलेला किंवा एकाच ठिकाणी स्थायी झालेले समाजबांधवच पुढाकार घेत आहेत. रानावनात मेंढ्या घेऊन भटकणारा समाज आजही यापासून खूप दूर आहे. आमच्या समाजात नेमका ‘प्रकाश’ कधी पडेल, असा प्रश्न आता या समाजातील शिकलेले तरुण व्यक्त करू लागले आहेत. 

जुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!दिवाळीनिमित्त सर्वच जण नवीन कपडे घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, आमच्या नशिबी आठराविश्वे दारिद्र्य व नीट पोटाला भाकरही मिळत नाही. आमच्या अनेक लेकरांचे बालपणही मेंढरांसोबतच रानावनात जाते. अनेक दिवस नातेवाईक भेटत नाहीत. अंगावरील फाटक्या कपड्यांना ठिगळांचा आधार दिलेला असतो. आमची दिवाळी ही अशीच येते आणि जाते. संपूर्ण आयुष्यात ऐशआराम, लखलखाट काय असतो, याच्या जवळ कधीच गेलो नाही. अशी खंत या समाजातील बाळू शंकर सावळे या मेंढपाळाने व्यक्त केली.

टॅग्स :forestजंगलDiwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबाद