शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

ना लखलखता प्रकाश, ना दिव्यांची आरास; आमची दिवाळी असते रानावनात मेंढ्यांच्या कळपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:10 IST

उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जाते

ठळक मुद्देजुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!

- रघुनाथ सावळेउंडणगाव : दिवाळी म्हटले की, आनंदाचा महोत्सव शहर असो की गाव, सगळीकडे आनंदाला उधाण आलेले असते. मात्र, पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या व गावोगाव मेंढ्या घेऊन भटकंती करणारा धनगर समाज या आनंदापासून वर्षानुवर्षे वंचित आहे. 

गाव सोडून रानावनात मेंढ्यांच्या सान्निध्यातच त्यांची दिवाळी पार पडते. ना फटाके ना नवीन कपडे, ना लखलखता प्रकाश ना दिव्यांची आरास. उघड्या रानावनात आभाळाच्या छप्पराखाली व रात्रीच्या अंधारातच त्यांची दिवाळी येते आणि जातेही, मेंढरे व आपले काम भले यातच जीवन व आनंद सामावलेला असल्याचे ते आजही समजतात. दिवाळीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये काही दिवसांपासून धामधूम सुरू आहे. २१ व्या शतकातील मनुष्य हा चंद्रावर जाऊन आला आहे. जगामध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडू लागल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोंडीपासून मागासलेल्या ‘धनगर’ समाज आजही कोसोदूर आहे. त्यांना जगाशी काहीही घेणे- देणे नाही. दिवाळी व पाडवा सणानिमित्त सर्वत्र आनंद संचारलेला असताना नेहमी जंगलात जीवन जगणाऱ्या मागासलेल्या ‘धनगर’ समाजाचे सर्व दिवस हे सारखेच असतात.

उघड्या रानावनात चूल पेटली की, त्या प्रकाशात जेवण करून घेणे व नंतर अंधारातच मेंढरांचा संभाळ करणे यातच ‘अपुलं जीवन - मरण समावलेलं आहे रं गड्या....!’ असे म्हणून धनगर समाजाचे मेंढपाळ हे दिवाळी सण साजरा करीत असतात. प्रवाहापासून कोसोदूर असलेल्या  धनगर समाजाने आता एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. मात्र, या लढाईत शिकलेला किंवा एकाच ठिकाणी स्थायी झालेले समाजबांधवच पुढाकार घेत आहेत. रानावनात मेंढ्या घेऊन भटकणारा समाज आजही यापासून खूप दूर आहे. आमच्या समाजात नेमका ‘प्रकाश’ कधी पडेल, असा प्रश्न आता या समाजातील शिकलेले तरुण व्यक्त करू लागले आहेत. 

जुने कपडे... अन् त्यालाही ठिगळं...!दिवाळीनिमित्त सर्वच जण नवीन कपडे घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, आमच्या नशिबी आठराविश्वे दारिद्र्य व नीट पोटाला भाकरही मिळत नाही. आमच्या अनेक लेकरांचे बालपणही मेंढरांसोबतच रानावनात जाते. अनेक दिवस नातेवाईक भेटत नाहीत. अंगावरील फाटक्या कपड्यांना ठिगळांचा आधार दिलेला असतो. आमची दिवाळी ही अशीच येते आणि जाते. संपूर्ण आयुष्यात ऐशआराम, लखलखाट काय असतो, याच्या जवळ कधीच गेलो नाही. अशी खंत या समाजातील बाळू शंकर सावळे या मेंढपाळाने व्यक्त केली.

टॅग्स :forestजंगलDiwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबाद