शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 18:56 IST

एमआयएम सर्व पक्षांचे उमेदवार घोषित झाल्यावर आपले उमेदवार जाहीर करणार

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीसोबत अनेकदा युती करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. युतीसोबतची चर्चा पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेते यांच्यात सुरू आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत निर्णय होईल. एमआयएम सर्व पक्षांचे उमेदवार घोषित झाल्यावर आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम आपल्या उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर रविवारी भाजपाने ९९ उमेदवारांची घोषणा करून आघाडी घेतली. सोमवारपासून अन्य पक्षांचे उमेदवारही जाहीर होतील. एमआयएम आपल्या उमेदवारांची घोषणा कधी करणार यासंदर्भात इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत एमआयएम पक्षालाही घ्यावे असा प्रस्ताव अनेकदा दिला. राज्यातील काही काँग्रेस नेत्यांसोबत माझी प्राथमिक स्तरावर चर्चाही झाली. त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. युतीसंदर्भात स्वत: पक्षाचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करीत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. युतीसंदर्भात निर्णय लवकर व्हावा ही माझीही इच्छा आहे. किती दिवस आम्ही वाट पाहावी हा प्रश्न आहे.

मंगळवारी पक्षप्रमुखांसोबत चर्चामंगळवारी मी हैदराबादला जाणार आहे. तेथे पक्षप्रमुखांना राज्यातील परिस्थिती संदर्भात माहिती देणार आहे. उमेदवारांसंदर्भात चर्चा होईल. कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय ते स्वत: घेतील. उमेदवार जाहीर करण्याची आम्ही अजिबात घाई करणार नाही. सर्वांत शेवटी एमआयएम पक्षाचे उमेदवार जाहीर होतील. किती जागा लढविणार हेसुद्धा मी जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलcongressकाँग्रेस