शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाहीत ना?

By साहेबराव हिवराळे | Updated: April 21, 2023 17:17 IST

लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याची अन्न सुरक्षा आठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या २५ हजारांपेक्षा अधिक दुकानांची संख्या आहे. सध्या यात्रा उत्सवाची धूम सुरू असल्याने गावपातळीवर खाद्यपदार्थांची वडा पाव, समोसे, भजी विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यांच्याकडे वापरात येणाऱ्या तेलाची गुणवत्ता (टीपीसी) किती, हे अन्न औषधी प्रशासनाने विभाग तपासण्याची गरज आहे.

आरोग्याच्या दृष्टीने ते खाद्यपदार्थ नुकसानदायी ठरू नये, यासाठी जनजागृती करीत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; असे म्हणता येत नाही, तर वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती वाढविण्याची गरज आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखजिल्ह्याची ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असून, तालुक्याची जबाबदारी एकावर आहे. सध्या ५ जण जिल्ह्यात कार्यरत असून, तीन ते चार जणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. प्रत्येक तालुक्यात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने २५ हजारजिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारी जवळपास २५ हजारांवर दुकाने आहेत. खाद्यपदार्थाची तपासणी दर आठवड्यास साधारणपणे दोनशे ठिकाणी होते.

तपासणीसाठी केवळ पाच अधिकारीजिल्हाभरात कार्यालयात आठ अधिकाऱ्यांची संख्या असून, केवळ पाच अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त जबाबदारी तीन ते चार अधिकाऱ्यांवर आहे. ही संख्या वाढवण्याची गरज आहे.

एका अधिकाऱ्यावर हजार दुकानांचा भारशहर व तालुक्यातील दुकानाची आकडेवारी लक्षात घेता एका अधिकाऱ्यावर हजाराच्या जवळपास दुकानाचा भार येतो. टीपीसी तपासणीचे काम अधिकारी करतात.

तपासणीशिवाय अन्न निरीक्षकांवर इतर कामांचा व्यापअन्न निरीक्षकांना खाद्यपदार्थ तपासणीची कामे आहेतच; त्याशिवाय अधिकाऱ्यांवर कागदी पाठपुरावा देखील करावा लागतो. इतरही विचारलेली माहिती द्यावी लागते.

आरोग्याची काळजी महत्त्वाची२५ हजारांवर दुकाने असून, त्यापैकी बहुतांश दुकानांची तपासणी करणेदेखील शक्य होत नाही. जनजागृतीवर भर दिला आहे. आपण खातो ते अन्न गुणवत्तापूर्वक आहे का, हे पाहूनच त्याचे सेवन करावे.-अजित मैत्रे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न