शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाहीत ना?

By साहेबराव हिवराळे | Updated: April 21, 2023 17:17 IST

लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याची अन्न सुरक्षा आठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या २५ हजारांपेक्षा अधिक दुकानांची संख्या आहे. सध्या यात्रा उत्सवाची धूम सुरू असल्याने गावपातळीवर खाद्यपदार्थांची वडा पाव, समोसे, भजी विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यांच्याकडे वापरात येणाऱ्या तेलाची गुणवत्ता (टीपीसी) किती, हे अन्न औषधी प्रशासनाने विभाग तपासण्याची गरज आहे.

आरोग्याच्या दृष्टीने ते खाद्यपदार्थ नुकसानदायी ठरू नये, यासाठी जनजागृती करीत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; असे म्हणता येत नाही, तर वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती वाढविण्याची गरज आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखजिल्ह्याची ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असून, तालुक्याची जबाबदारी एकावर आहे. सध्या ५ जण जिल्ह्यात कार्यरत असून, तीन ते चार जणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. प्रत्येक तालुक्यात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने २५ हजारजिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारी जवळपास २५ हजारांवर दुकाने आहेत. खाद्यपदार्थाची तपासणी दर आठवड्यास साधारणपणे दोनशे ठिकाणी होते.

तपासणीसाठी केवळ पाच अधिकारीजिल्हाभरात कार्यालयात आठ अधिकाऱ्यांची संख्या असून, केवळ पाच अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त जबाबदारी तीन ते चार अधिकाऱ्यांवर आहे. ही संख्या वाढवण्याची गरज आहे.

एका अधिकाऱ्यावर हजार दुकानांचा भारशहर व तालुक्यातील दुकानाची आकडेवारी लक्षात घेता एका अधिकाऱ्यावर हजाराच्या जवळपास दुकानाचा भार येतो. टीपीसी तपासणीचे काम अधिकारी करतात.

तपासणीशिवाय अन्न निरीक्षकांवर इतर कामांचा व्यापअन्न निरीक्षकांना खाद्यपदार्थ तपासणीची कामे आहेतच; त्याशिवाय अधिकाऱ्यांवर कागदी पाठपुरावा देखील करावा लागतो. इतरही विचारलेली माहिती द्यावी लागते.

आरोग्याची काळजी महत्त्वाची२५ हजारांवर दुकाने असून, त्यापैकी बहुतांश दुकानांची तपासणी करणेदेखील शक्य होत नाही. जनजागृतीवर भर दिला आहे. आपण खातो ते अन्न गुणवत्तापूर्वक आहे का, हे पाहूनच त्याचे सेवन करावे.-अजित मैत्रे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न