शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाहीत ना?

By साहेबराव हिवराळे | Updated: April 21, 2023 17:17 IST

लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याची अन्न सुरक्षा आठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या २५ हजारांपेक्षा अधिक दुकानांची संख्या आहे. सध्या यात्रा उत्सवाची धूम सुरू असल्याने गावपातळीवर खाद्यपदार्थांची वडा पाव, समोसे, भजी विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यांच्याकडे वापरात येणाऱ्या तेलाची गुणवत्ता (टीपीसी) किती, हे अन्न औषधी प्रशासनाने विभाग तपासण्याची गरज आहे.

आरोग्याच्या दृष्टीने ते खाद्यपदार्थ नुकसानदायी ठरू नये, यासाठी जनजागृती करीत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणीच नाही; असे म्हणता येत नाही, तर वडा, समोसे पोट तर बिघडवणार नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्याला प्रत्येकी एक अधिकारी असला तरी चारजणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती वाढविण्याची गरज आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखजिल्ह्याची ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असून, तालुक्याची जबाबदारी एकावर आहे. सध्या ५ जण जिल्ह्यात कार्यरत असून, तीन ते चार जणांवर अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. प्रत्येक तालुक्यात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने २५ हजारजिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारी जवळपास २५ हजारांवर दुकाने आहेत. खाद्यपदार्थाची तपासणी दर आठवड्यास साधारणपणे दोनशे ठिकाणी होते.

तपासणीसाठी केवळ पाच अधिकारीजिल्हाभरात कार्यालयात आठ अधिकाऱ्यांची संख्या असून, केवळ पाच अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त जबाबदारी तीन ते चार अधिकाऱ्यांवर आहे. ही संख्या वाढवण्याची गरज आहे.

एका अधिकाऱ्यावर हजार दुकानांचा भारशहर व तालुक्यातील दुकानाची आकडेवारी लक्षात घेता एका अधिकाऱ्यावर हजाराच्या जवळपास दुकानाचा भार येतो. टीपीसी तपासणीचे काम अधिकारी करतात.

तपासणीशिवाय अन्न निरीक्षकांवर इतर कामांचा व्यापअन्न निरीक्षकांना खाद्यपदार्थ तपासणीची कामे आहेतच; त्याशिवाय अधिकाऱ्यांवर कागदी पाठपुरावा देखील करावा लागतो. इतरही विचारलेली माहिती द्यावी लागते.

आरोग्याची काळजी महत्त्वाची२५ हजारांवर दुकाने असून, त्यापैकी बहुतांश दुकानांची तपासणी करणेदेखील शक्य होत नाही. जनजागृतीवर भर दिला आहे. आपण खातो ते अन्न गुणवत्तापूर्वक आहे का, हे पाहूनच त्याचे सेवन करावे.-अजित मैत्रे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न