शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निरंजन भाकरेंचं कोरोनानं निधन, आयुष्यभर 'भारूडाचं गारुड' जपलेला लोककलावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:41 PM

रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील भाकरे यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन व भारुडाचा वारसा वडीलांकडून मिळाला होता. वडीलांचे छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

ठळक मुद्देभारुड लोककलेला त्यांनी सर्वस्व जीवन अर्पण केले होतं. भारुडातून समाजप्रबोधनाचा वसा घेतला. भारुड हेच माझ्या रोजगाराचे साधन आहे. माझ्या कामात माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे.

औरंगाबाद – प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे (वय ६२) यांचे शुक्रवारी करोनाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारुडाच्या माध्यमातून आयुष्यभर अवयवदान चळवळीची जनजागृती त्यांनी केली. मात्र, दुर्दैवाने कोरोनामुळे त्यांचे निधन झाले अन् त्याचे स्वत:चे अवयव दानाचे स्वप्न स्वप्नच राहिले. 

रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील भाकरे यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन व भारुडाचा वारसा वडीलांकडून मिळाला होता. वडीलांचे छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. वडील जुने नाटकर्मी होते. अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्यामुळे घरातून कलेचा वारसा मिळाला. लहानपणी त्यांनीसुद्धा ग्रामीण भागातील नाटकात छोट्या भूमिका केल्या. कलापथकात हार्मोनिअम वाजविण्याचे काम करायचे. कार्यक्रमानिमित्त ठाणे येथे होते. वर्तमानपत्रात अशोक परांजपे यांच्याविषयी वाचून भारावले. त्यांची भेट घेतली अन आयुष्य बदलले. त्यांनीच लोककलेचा मार्ग दाखविला आणि भारुडाने त्यांना गारुड घातले ते आयुष्यभराठीच.

भारुड लोककलेला त्यांनी सर्वस्व जीवन अर्पण केले होतं. भारुडातून समाजप्रबोधनाचा वसा घेतला. भारुड हेच माझ्या रोजगाराचे साधन आहे. माझ्या कामात माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे. पत्नीचा माझ्यावर  अन माझा पत्नीवर विश्वास आहे. प्रत्येक संकटात ती माझ्या सोबत असते. संघर्षात तिने मला खंबीर साथ दिली आहे. मुलगा शेखर सावलीसारखा माझ्यासोबत उभा असतो. तो अत्यंत आज्ञाधारक आणि मेहनती आहे, असं ते म्हणायचे. 

भारुड आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये माझे कार्यक्रम झाले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझी नोंद झाली. मात्र भारुडाचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती हालाखिची होती. संकटांशी संघर्ष करीत लोककलेची उपासना केली त्याला आज यशाची फळे लागली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

कलाकार तरुणपणी घराबाहेर अन म्हातारपणी घरात असतो. तारुण्यात पैसा, ग्लॅमर, प्रसिद्धी, नाव याच्या मागे बेधुंद धावत असतो. मात्र त्याचवेळी आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जीवन हे अमूल्य आहे. कधी काय होईल, सांगता येत नाही. त्यामुळे आपले आरोग्य जपा. माणूस सर्व सोंगे घेऊ शकतो. परंतू पैशाचे सोंग घेता येत नाही. त्यामुळे कमावलेला पैसा बचत करुन ठेवा. चंगळवादाच्या नादात पैसा खर्च करु नका. म्हातारपणी तुमचाच पैसा तुमच्या कामी येईल. आज अनेक कलाकार पैसा नसल्यामुळे वैद्यकिय खर्च करु शकत नाही. आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी नवोदितांनी आतापासून याची काळजी घ्यावी. माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे परिस्थितीमुळे शिकता आले नाही. कुटूंबियांचे व माझे पोट भरण्यासाठी रोजगार शोधणे आवश्यक होते. खासगी कंपनीत कामे केली. मात्र जम बसला नाही. कुठेच मन रमले नाही. लोककलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. आज भारुड हाच माझा श्वास आहे, असं ते म्हणायचे. आज कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल