शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

येत्या ५ वर्षांत राज्य दुष्काळमुक्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:48 IST

ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. 

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ कार्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हा परिषदेतील सभागृहात बैठक घेण्यात आली. पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे.

औरंगाबाद : पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यात राज्यातील ५ हजार गावांनी सहभाग घेतला आहे. यातील ३ हजार गावे श्रमदानाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील. या स्पर्धेमुळे गावागावांत अपूर्व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. गावकरीच नव्हे तर राजकीय नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी या श्रमदानात सहभागी होत आहेत. अशाच ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रदुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. 

भारतीय जैन संघटनेच्या ‘दुष्काळमुक्तमहाराष्ट्र’ कार्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हा परिषदेतील सभागृहात बैठक घेण्यात आली. तेव्हा त्यांनी राज्यात लोकचळवळीतून दुष्काळमुक्तीचे किती मोठे काम उभारले जातेय याची माहिती दिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती. शांतीलाल मुथा यांनी सांगितले की, जे गाव  वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. पाणी फाऊंडेशनने ठरवून दिलेल्या श्रमदानाचा टप्पा ज्या गावांनी पूर्ण केला आहे, अशा गावांना बीजेएस पोकलेन व जेसीबी देणार आहे. स्पर्धा ८ एप्रिल रोजी सुरू झाली असून, २२ मे रोजी संपणार आहे.

आजपर्यंत संघटनेने ६५० पोकलेन व जेसीबी सुरू केल्या आहेत. ३ हजार गावांमध्ये ३ हजार पोकलेन व जेसीबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २२ मेपर्यंत सुमारे ६ लाख २५ हजार तास जेसीबी चालणार आहेत. यासाठी राज्यातूनच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड या राज्यांतूनही जेसीबी मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्या गावात जेसीबी व पोकलेन आहेत त्यांचाही वापर करून घेण्यात येत आहे.  बीजेएसचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. गौतम संचेती म्हणाले की, या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटनेने संपूर्ण प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी मुख्य कार्यालयामध्ये १६ जणांचे पथक नियुक्त केले आहे. ७५ तालुक्यांत १०० तालुका समन्वयक नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी  संघटनेचे पारस चोरडिया, पारस बागरेचा, किशोर ललवाणी, प्रवीण पारख, प्रफुल्ल श्रीश्रीमाळ, प्रकाश कोचेटा यांची उपस्थिती होती. 

प्रत्येक गावाला डिझेलसाठी शासन देणार दीड लाख 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक गावाला डिझेलपोटी राज्य शासन दीड लाख रुपये देणार आहे. त्याचा वापर गावकऱ्यांनी पोकलेन व जेसीबीच्या इंधनासाठी करावा. स्पर्धेच्या निमित्ताने सुरू झालेली लोकचळवळ गाव दुष्काळमुक्त झाल्यावरच संपवावी, असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत फुलंब्री, खुलताबाद व वैजापूर या तालुक्यांतील १६२ गावे सहभागी झाली असून, लोकचळवळीतूनच अशा योजना यशस्वी होऊ शकतात, असे आ. प्रशांत बंब यांनी नमूद केले. 

महाश्रमदान १ मे रोजी  या स्पर्धेनिमित्त राज्यातील ५ हजार गावांमध्ये १ मे रोजी महाश्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. श्रमदान करण्यासाठी, खेड्यात जाण्यासाठी राज्यातील दीड लाख शहरवासीयांनी नोंदणी केल्याची माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपातdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र