शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

येत्या ५ वर्षांत राज्य दुष्काळमुक्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:48 IST

ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. 

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ कार्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हा परिषदेतील सभागृहात बैठक घेण्यात आली. पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे.

औरंगाबाद : पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यात राज्यातील ५ हजार गावांनी सहभाग घेतला आहे. यातील ३ हजार गावे श्रमदानाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील. या स्पर्धेमुळे गावागावांत अपूर्व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. गावकरीच नव्हे तर राजकीय नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी या श्रमदानात सहभागी होत आहेत. अशाच ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रदुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. 

भारतीय जैन संघटनेच्या ‘दुष्काळमुक्तमहाराष्ट्र’ कार्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हा परिषदेतील सभागृहात बैठक घेण्यात आली. तेव्हा त्यांनी राज्यात लोकचळवळीतून दुष्काळमुक्तीचे किती मोठे काम उभारले जातेय याची माहिती दिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती. शांतीलाल मुथा यांनी सांगितले की, जे गाव  वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. पाणी फाऊंडेशनने ठरवून दिलेल्या श्रमदानाचा टप्पा ज्या गावांनी पूर्ण केला आहे, अशा गावांना बीजेएस पोकलेन व जेसीबी देणार आहे. स्पर्धा ८ एप्रिल रोजी सुरू झाली असून, २२ मे रोजी संपणार आहे.

आजपर्यंत संघटनेने ६५० पोकलेन व जेसीबी सुरू केल्या आहेत. ३ हजार गावांमध्ये ३ हजार पोकलेन व जेसीबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २२ मेपर्यंत सुमारे ६ लाख २५ हजार तास जेसीबी चालणार आहेत. यासाठी राज्यातूनच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड या राज्यांतूनही जेसीबी मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्या गावात जेसीबी व पोकलेन आहेत त्यांचाही वापर करून घेण्यात येत आहे.  बीजेएसचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. गौतम संचेती म्हणाले की, या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटनेने संपूर्ण प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी मुख्य कार्यालयामध्ये १६ जणांचे पथक नियुक्त केले आहे. ७५ तालुक्यांत १०० तालुका समन्वयक नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी  संघटनेचे पारस चोरडिया, पारस बागरेचा, किशोर ललवाणी, प्रवीण पारख, प्रफुल्ल श्रीश्रीमाळ, प्रकाश कोचेटा यांची उपस्थिती होती. 

प्रत्येक गावाला डिझेलसाठी शासन देणार दीड लाख 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक गावाला डिझेलपोटी राज्य शासन दीड लाख रुपये देणार आहे. त्याचा वापर गावकऱ्यांनी पोकलेन व जेसीबीच्या इंधनासाठी करावा. स्पर्धेच्या निमित्ताने सुरू झालेली लोकचळवळ गाव दुष्काळमुक्त झाल्यावरच संपवावी, असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत फुलंब्री, खुलताबाद व वैजापूर या तालुक्यांतील १६२ गावे सहभागी झाली असून, लोकचळवळीतूनच अशा योजना यशस्वी होऊ शकतात, असे आ. प्रशांत बंब यांनी नमूद केले. 

महाश्रमदान १ मे रोजी  या स्पर्धेनिमित्त राज्यातील ५ हजार गावांमध्ये १ मे रोजी महाश्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. श्रमदान करण्यासाठी, खेड्यात जाण्यासाठी राज्यातील दीड लाख शहरवासीयांनी नोंदणी केल्याची माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपातdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र