शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

नवीन पाणीपुरवठा योजनेस स्थगिती नाही; औरंगाबाद विकासासाठी राज्य सरकारचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 14:22 IST

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी पहिला चौकारच मारण्यात आला आहे.

ठळक मुद्दे1680 कोटींच्या नव्या पाणीयोजनेला स्थगिती नाही267 कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर08 कोटी रुपये संत एकनाथ नाट्यगृहासाठी59 कोटी रुपये ठाकरे स्मारकासाठी 

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली नसल्याचा निर्वाळा आज नगरविकास विभागाने लेखी पत्राद्वारे दिला. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा मार्ग आणखी मोकळा झाला. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २६७ कोटी, संत एकनाथ रंगमंदिरासाठी ८ कोटी, बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ५९ कोटी रुपये देण्याचे आश्वासन नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा पदाधिकारी, शिवसेना नेत्यांना दिले. या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे शहर विकासाला गती मिळणार आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी पहिला चौकारच मारण्यात आला आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी १,६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून ही योजना मंजूर केली होती. विद्यमान सरकारने या योजनेला स्थगिती दिल्याच्या मुद्यावरून भाजपने सेनेची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली होती. आज नगरविकास विभागाने योजनेला स्थगिती दिली नसल्याचा निर्वाळा देत योजनेची निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच राज्यातील काही विकासकामांना ब्रेक लावला. त्यामध्ये औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेचाही समावेश असल्याची ओरड भाजपकडून सुरू झाली. याच मुद्यावर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी जोरदार निदर्शनेही केली. सेनेवर दबाव वाढविण्यासाठी सर्व भाजप नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षाकडे सादर केले. महापालिकेत सेनेसोबत असलेली युती तुटल्याचेही भाजपने जाहीर करून टाकले. स्थायी समिती सभापती, वॉर्ड सभापती आदी पदांवर भाजपचे पदाधिकारी कायम आहेत.

नवीन पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर भाजपने महापालिकेत सेनेची चांगलीच कोंडी केली. त्यानंतर तातडीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा सभागृह नेते विकास जैन आज नागपुरात दाखल झाले. त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी पुन्हा नमूद केले की, नवीन पाणीपुरवठा योजनेला शासनाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. नगरविकास विभागाने यासंदर्भात पत्र द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर नगरविकास विभागाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी आ. अंबादास दानवे यांना पत्र पाठविले. या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्टÑ सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सुरू ठेवावी. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, मनपा आयुक्तांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे.

पत्र पाहिजे हे घ्या...नवीन पाणीपुरवठा योजनेला स्थगिती नाही, असे सेना नेत्यांनी वारंवार सांगितले. त्यानंतरही भाजपचे नगरसेवक स्थगिती नाही, असे पत्र दाखवा, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करीत होते. आता नगरविकास विभागाने योजनेला स्थगिती नसल्याचा निर्वाळा दिल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. 

निविदेची मुदत १५ दिवस कमी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया संपताच वर्कआॅर्डर देण्यासाठी विलंब लागेल. त्यात मनपा निवडणुकीची आचारसंहिताही लागू शकते. त्यामुळे निविदा भरण्याची मुदत ३० डिसेंबर करावी, अशी मागणी सेना नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली.

शहरातील रस्ते गुळगुळीत होणारशहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने २६७ कोटी रुपयांची मागणी यापूर्वीच शासनाकडे केली आहे. रस्त्यांसाठी निधी देण्याची हमी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढील आठवड्यात यासंदर्भात मुंबईत एक बैठक आयोजित करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. महाराष्टÑ शासनाने यापूर्वी दिलेल्या १०० कोटींतील रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही शिष्टमंडळाने दिली.

संत एकनाथ रंगमंदिराचे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता उस्मानपुऱ्यातील संत एकनाथ रंगमंदिराचे काम महापालिकेने सुरू केले आहे. या कामासाठी निधी कमी पडत असल्याने काम थांबले होते. महापालिकेने राज्य शासनाकडे ८ कोटींची मागणी केली होती. मंत्री एकनाथ शिंदे यांनी संत एकनाथ रंगमंदिराला ८ कोटी रुपये देण्यास तत्त्वत: मान्यता दिली.

बाळासाहेब ठाकरे स्मारकही मार्गी लागणारएमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपाला ५ कोटी रुपये दिले आहेत. मनपाने विकास आराखडा तयार केला. प्रकल्पास ६४ कोटी रुपये लागत आहेत. मनपाने निविदा प्रक्रियाही राबवून ठेवली आहे. अलीकडे देवेंद्र फडणवीस सरकारने स्मारक १० कोटीतच पूर्ण करा म्हणून सेनेची कोंडी केली होती. आज सेना नेत्यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी उर्वरित ५९ कोटी रुपये देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद