शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
4
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
5
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
6
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
7
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
8
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
9
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
10
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
11
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
12
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
13
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
14
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
15
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
16
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
17
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
18
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
19
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
20
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न

औरंगाबाद खंडपीठात नवीन पायंडा; रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी करत ५०० पैकी ४०० प्रकरणे काढली निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 11:09 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (२० डिसेंबर) एक नवीन पायंडा पाडला. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. आंचलिया यांच्यासमोर रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. खंडपीठाने पाचशे प्रकरणांपैकी तब्बल चारशे प्रकरणांवर सुनावणी घेऊन ती निकाली काढली. 

ठळक मुद्देनाताळच्या सुट्यांमुळे सोमवारी (१८ डिसेंबर) खंडपीठाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ५०६ रिट याचिका दाखल करून घेतल्या सर्व याचिकांना बुधवारी सुनावणीची वेळ दिली. बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू झाली. रात्री आठ वाजता सुनावणी थांबली तेव्हा चारशे प्रकरणांवर सुनावणी झाली होती.यातील ४६५ प्रकरणे नव्याने दाखल करण्यात आलेली होती.

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (२० डिसेंबर) एक नवीन पायंडा पाडला. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. आंचलिया यांच्यासमोर रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. खंडपीठाने पाचशे प्रकरणांपैकी तब्बल चारशे प्रकरणांवर सुनावणी घेऊन ती निकाली काढली. 

सोमवारी (१८ डिसेंबर) वकील आणि पक्षकारांच्या सोयीनुसार तातडीच्या प्रकरणांमध्ये सुनावणीसाठी वेळ देऊन बुधवारी वरीलप्रमाणे प्रकरणे निकाली काढली.  मुंबई, नागपूर, गोवा येथील उच्च न्यायालयांच्या तुलनेत औरंगाबाद खंडपीठात जास्तीचे काम असून, न्यायालयांची संख्या मात्र कमी आहे. तिन्ही न्यायालयांच्या तुलनेत औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित प्रकरणांची संख्याही अधिक आहे. औरंगाबाद खंडपीठात दरवर्षी पंधरा हजारांपेक्षा जास्त नवीन याचिका दाखल होतात. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ११ डिसेंबरला नवीन रिट याचिका दाखल करण्यासाठी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. आंचलिया यांची नियुक्ती केली. काही कारणास्तव मागील आठवड्यात सुनावणी झाली नाही. 

नाताळच्या सुट्यांमुळे सोमवारी (१८ डिसेंबर) खंडपीठाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ५०६ रिट याचिका दाखल करून घेतल्या आणि बुधवारी सुनावणीची वेळ दिली. बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू झाली. प्रकरणनिहाय आदेश पारित करण्यात आले. दुपारी १.३० वाजता जेवणाच्या ब्रेकनंतर २.३० वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. रात्री ७.४५ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. रात्री आठ वाजता सुनावणी थांबली तेव्हा चारशे प्रकरणांवर सुनावणी झाली होती. यातील ४६५ प्रकरणे नव्याने दाखल करण्यात आलेली होती. शिवाय आज पुन्हा दोन तातडीची प्रकरणे दाखल करण्यास खंडपीठाने परवानगी दिली. राज्य-केंद्र शासन आणि त्यांच्या अंगिकृत संस्थांविरुद्ध दाद मागण्यासाठी खंडपीठात जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. खंडपीठात वर्षाकाठी पंधरा हजारांवर प्रकरणे दाखल होतात.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद