शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

औरंगाबाद खंडपीठात नवीन पायंडा; रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी करत ५०० पैकी ४०० प्रकरणे काढली निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 11:09 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (२० डिसेंबर) एक नवीन पायंडा पाडला. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. आंचलिया यांच्यासमोर रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. खंडपीठाने पाचशे प्रकरणांपैकी तब्बल चारशे प्रकरणांवर सुनावणी घेऊन ती निकाली काढली. 

ठळक मुद्देनाताळच्या सुट्यांमुळे सोमवारी (१८ डिसेंबर) खंडपीठाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ५०६ रिट याचिका दाखल करून घेतल्या सर्व याचिकांना बुधवारी सुनावणीची वेळ दिली. बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू झाली. रात्री आठ वाजता सुनावणी थांबली तेव्हा चारशे प्रकरणांवर सुनावणी झाली होती.यातील ४६५ प्रकरणे नव्याने दाखल करण्यात आलेली होती.

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (२० डिसेंबर) एक नवीन पायंडा पाडला. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. आंचलिया यांच्यासमोर रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. खंडपीठाने पाचशे प्रकरणांपैकी तब्बल चारशे प्रकरणांवर सुनावणी घेऊन ती निकाली काढली. 

सोमवारी (१८ डिसेंबर) वकील आणि पक्षकारांच्या सोयीनुसार तातडीच्या प्रकरणांमध्ये सुनावणीसाठी वेळ देऊन बुधवारी वरीलप्रमाणे प्रकरणे निकाली काढली.  मुंबई, नागपूर, गोवा येथील उच्च न्यायालयांच्या तुलनेत औरंगाबाद खंडपीठात जास्तीचे काम असून, न्यायालयांची संख्या मात्र कमी आहे. तिन्ही न्यायालयांच्या तुलनेत औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित प्रकरणांची संख्याही अधिक आहे. औरंगाबाद खंडपीठात दरवर्षी पंधरा हजारांपेक्षा जास्त नवीन याचिका दाखल होतात. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ११ डिसेंबरला नवीन रिट याचिका दाखल करण्यासाठी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. आंचलिया यांची नियुक्ती केली. काही कारणास्तव मागील आठवड्यात सुनावणी झाली नाही. 

नाताळच्या सुट्यांमुळे सोमवारी (१८ डिसेंबर) खंडपीठाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ५०६ रिट याचिका दाखल करून घेतल्या आणि बुधवारी सुनावणीची वेळ दिली. बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू झाली. प्रकरणनिहाय आदेश पारित करण्यात आले. दुपारी १.३० वाजता जेवणाच्या ब्रेकनंतर २.३० वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. रात्री ७.४५ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. रात्री आठ वाजता सुनावणी थांबली तेव्हा चारशे प्रकरणांवर सुनावणी झाली होती. यातील ४६५ प्रकरणे नव्याने दाखल करण्यात आलेली होती. शिवाय आज पुन्हा दोन तातडीची प्रकरणे दाखल करण्यास खंडपीठाने परवानगी दिली. राज्य-केंद्र शासन आणि त्यांच्या अंगिकृत संस्थांविरुद्ध दाद मागण्यासाठी खंडपीठात जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. खंडपीठात वर्षाकाठी पंधरा हजारांवर प्रकरणे दाखल होतात.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद