शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ऑरिक सिटीत केंद्राच्या धोरणानुसार नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 1:19 PM

Auric City पालकमंत्री सुभाष देसाई यांची निती आयोगाचे अमिताभ कांत यांच्याकडे मागणी करणार

ठळक मुद्देऔरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे.शहरासाठी १६८० कोटींंची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

औरंगाबाद : ऑरिक सिटीत केंद्राच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार मागणी केलेले उद्योग यावेत, अशी मागणी या अगोदरच करण्यात आलेली आहे. आता पुन्हा उद्या निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे आमचे अधिकारी यासंबंधीची मागणी करणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये केंद्र शासन पुरस्कृत इलेक्ट्रॉनिक पार्क, फूड पार्क तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग यावे म्हणून पाठपुरावा करण्यात आला आहे. अमिताभ कांत यांच्याकडे पुन्हा एकदा मागणी करण्यात येणार आहे, तर संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटींचा निधी देण्यात आला आहे. लसीकरणासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, २१ जूनपासून केंद्राच्या नवीन धोरणानुसार प्रत्येकाला लस देण्यात येईल. जिल्ह्याचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार असून, ६ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी ३०० व्हेंटिलेटरसह खाटांची सुविधा करण्यात येत आहे. ११ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येतील. त्यातील ४ सुरू झाले आहेत. खासगी रुग्णालयांच्या बिल प्रकरणी अनेक तक्रारी होत्या. ५७ लेखापरीक्षक नेमून बिलांची तपासणी करण्यात आली. ९७ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १५ रुग्णालयांनी जास्तीचे बिल वसूल केले होते. त्यांच्याकडून ६५ लाख रुपये वसूल केले. पत्रकार परिषदेला आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते.

नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण होणारशहरासाठी १६८० कोटींंची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तीन वर्षांत ही योजना पूर्ण होईल. डिसेंबर २०२१ पर्यंत २०, मार्च २०२२ पर्यंत शहरासाठी अतिरिक्त ३० एमएलडी पाणी वाढविण्यात येईल. नवीन योजनेत शहराचा काेणताही भाग पाण्याविना राहणार नाही. खाम नदीपात्रात मनपाकडून सुरू असलेल्या कामाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

औरंगाबाद-शिर्डीचे रस्त्याचे लवकरच कामऔरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. ८८ कि.मी. रस्त्याचे काम झाल्यावर पर्यटक, भाविकांची सोय होईल. औरंगाबाद शहरालाही याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याचे कामाची वर्क ऑर्डर ऑक्टोबरपर्यंत दिली जाईल. नगरनाका ते केंब्रीज १४ कि.मी. रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. बीड बायपासचे काम ऑगस्ट २१ मध्ये संपेल. फर्दापूर घाटातील रस्ता डिसेंबरपर्यंत होईल.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई