शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण होणे काळाची गरज

By admin | Updated: September 24, 2014 01:05 IST

औरंगाबाद : आजच्या काळात परराष्ट्र धोरण हा विषय पूर्वीच्या तुलनेत अतिशय संवेदनशील आहे.

औरंगाबाद : आजच्या काळात परराष्ट्र धोरण हा विषय पूर्वीच्या तुलनेत अतिशय संवेदनशील आहे. व्यक्ती आणि राष्ट्राच्या हितसंबंधांशी तो जोडलेला असून, परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण होणे आवश्यकआहे. देशात परराष्ट्र धोरण हा विषय सामान्य जनताच नव्हे, तर केंद्र सरकारकडूनही दुर्लक्षित केला गेलेला विषय आहे; परंतु अलीकडे प्रसारमाध्यमांमुळे या विषयाचे महत्त्व आणि आवश्यकता सर्वांना पटत आहे, असे प्रतिपादन जागतिक राजकारणाचे अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.देवगिरी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. उद््घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी म.शि.प्र. मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. मोहनराव सावंतहोते. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, परराष्ट्र धोरण हा विषय अतिशय महत्त्वाचा असून सामाजिकशास्त्राप्रमाणेच इतर शास्त्रांच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करावा. प्राचार्य डॉ. माणिकराव जाधव यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. सिंधुदुर्ग येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश पातरफोड यांनी विचार मांडले.जानेवारी २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३२ वे अधिवेशन बांधा कॉलेज (ता. सावंतवाडी) येथे होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अशोक नाईकवाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.