शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 07:38 IST

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे.

औरंगाबाद - इतिहासाची पुनरावृत्ती होतात असे म्हणतात. ८४ साली शरद पवारांना आजच्या सारखेच लोक सोडून जात होते मात्र गेले त्यापेक्षा दुप्पट आमदार पवारसाहेबांनी निवडून आणले. पानगळ गळली की नव्याने पालवी फुटते तशीच पानगळ जावून नवी पालवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फुटली आहे असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत मांडले. 

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला. आपली यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा संपुष्टात आणली. गंगापूरचे स्थानिक आमदारांनी असे भाष्य केले की आश्वासन फक्त द्यायचे असते पूर्ण करायचे नसते. या वाक्याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत करा. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा येत्या काळात बदल घडवून शिवस्वराज्य स्थापन करण्यास सिंहाचा वाटा द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

तसेच शिवस्वराज्य यात्रेला सुरुवातीला ट्रोल करण्यात आले. राष्ट्रवादीचे इतर नेते कुठे आहेत अशी विचारणा केली गेली. जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड पुरपरिस्थिती असल्याने जनतेची मदत करत आहेत. धनंजय मुंडे परळीतील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर भांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेतृत्व जनतेसाठी काम करत आहेत असेही अमोल कोल्हे म्हणाले. 

दरम्यान सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे. सरकारमार्फत दोन समाजात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. भांडणं लावून राजकारण करायचे हेच तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी करत येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचा मुख्यमंत्री असला पाहिजे असं आवाहन जनतेला केले.

शेतकर्‍यांची जाणीव नसलेले सरकार - अजित पवारशेतकऱ्यांची जाणीव नसलेले सरकार आल्यावर काय घडतं हे गेले पाच वर्ष राज्यातील जनता अनुभवत आहे सरकार जनतेकडे लक्ष न दिल्यामुळेच राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली. तरुणांच्या हाताला काम नाही. बेकारीशी झुंज देत आहेत. मेगाभरतीबाबत काय झाले याचा जबाब सरकारने द्यायला हवा. द्यायचे नाही तर लोकांची दिशाभूल का करता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला. तसेच आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय घटनेने आपल्याला दिला आहे परंतु सध्याचे सरकार दडपशाही करुन आंदोलन करणार्‍याला अटक करून तुरुंगात टाकत आहे. हे काय सुरु आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019