शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 07:38 IST

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे.

औरंगाबाद - इतिहासाची पुनरावृत्ती होतात असे म्हणतात. ८४ साली शरद पवारांना आजच्या सारखेच लोक सोडून जात होते मात्र गेले त्यापेक्षा दुप्पट आमदार पवारसाहेबांनी निवडून आणले. पानगळ गळली की नव्याने पालवी फुटते तशीच पानगळ जावून नवी पालवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फुटली आहे असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत मांडले. 

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला. आपली यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा संपुष्टात आणली. गंगापूरचे स्थानिक आमदारांनी असे भाष्य केले की आश्वासन फक्त द्यायचे असते पूर्ण करायचे नसते. या वाक्याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत करा. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा येत्या काळात बदल घडवून शिवस्वराज्य स्थापन करण्यास सिंहाचा वाटा द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

तसेच शिवस्वराज्य यात्रेला सुरुवातीला ट्रोल करण्यात आले. राष्ट्रवादीचे इतर नेते कुठे आहेत अशी विचारणा केली गेली. जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड पुरपरिस्थिती असल्याने जनतेची मदत करत आहेत. धनंजय मुंडे परळीतील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर भांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेतृत्व जनतेसाठी काम करत आहेत असेही अमोल कोल्हे म्हणाले. 

दरम्यान सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे. सरकारमार्फत दोन समाजात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. भांडणं लावून राजकारण करायचे हेच तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी करत येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचा मुख्यमंत्री असला पाहिजे असं आवाहन जनतेला केले.

शेतकर्‍यांची जाणीव नसलेले सरकार - अजित पवारशेतकऱ्यांची जाणीव नसलेले सरकार आल्यावर काय घडतं हे गेले पाच वर्ष राज्यातील जनता अनुभवत आहे सरकार जनतेकडे लक्ष न दिल्यामुळेच राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली. तरुणांच्या हाताला काम नाही. बेकारीशी झुंज देत आहेत. मेगाभरतीबाबत काय झाले याचा जबाब सरकारने द्यायला हवा. द्यायचे नाही तर लोकांची दिशाभूल का करता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला. तसेच आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय घटनेने आपल्याला दिला आहे परंतु सध्याचे सरकार दडपशाही करुन आंदोलन करणार्‍याला अटक करून तुरुंगात टाकत आहे. हे काय सुरु आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019