शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 07:38 IST

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे.

औरंगाबाद - इतिहासाची पुनरावृत्ती होतात असे म्हणतात. ८४ साली शरद पवारांना आजच्या सारखेच लोक सोडून जात होते मात्र गेले त्यापेक्षा दुप्पट आमदार पवारसाहेबांनी निवडून आणले. पानगळ गळली की नव्याने पालवी फुटते तशीच पानगळ जावून नवी पालवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फुटली आहे असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत मांडले. 

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला. आपली यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा संपुष्टात आणली. गंगापूरचे स्थानिक आमदारांनी असे भाष्य केले की आश्वासन फक्त द्यायचे असते पूर्ण करायचे नसते. या वाक्याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत करा. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा येत्या काळात बदल घडवून शिवस्वराज्य स्थापन करण्यास सिंहाचा वाटा द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

तसेच शिवस्वराज्य यात्रेला सुरुवातीला ट्रोल करण्यात आले. राष्ट्रवादीचे इतर नेते कुठे आहेत अशी विचारणा केली गेली. जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड पुरपरिस्थिती असल्याने जनतेची मदत करत आहेत. धनंजय मुंडे परळीतील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर भांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेतृत्व जनतेसाठी काम करत आहेत असेही अमोल कोल्हे म्हणाले. 

दरम्यान सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे. सरकारमार्फत दोन समाजात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. भांडणं लावून राजकारण करायचे हेच तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी करत येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचा मुख्यमंत्री असला पाहिजे असं आवाहन जनतेला केले.

शेतकर्‍यांची जाणीव नसलेले सरकार - अजित पवारशेतकऱ्यांची जाणीव नसलेले सरकार आल्यावर काय घडतं हे गेले पाच वर्ष राज्यातील जनता अनुभवत आहे सरकार जनतेकडे लक्ष न दिल्यामुळेच राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली. तरुणांच्या हाताला काम नाही. बेकारीशी झुंज देत आहेत. मेगाभरतीबाबत काय झाले याचा जबाब सरकारने द्यायला हवा. द्यायचे नाही तर लोकांची दिशाभूल का करता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला. तसेच आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय घटनेने आपल्याला दिला आहे परंतु सध्याचे सरकार दडपशाही करुन आंदोलन करणार्‍याला अटक करून तुरुंगात टाकत आहे. हे काय सुरु आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019