शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नाथसागर जोत्याखाली; शेकडो वर्षांचा वारसा उघडा पडल्याने भाविकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 14:40 IST

धरणामुळे विस्थापित झालेल्या गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावांच्या खाणाखुणा पाणी आटल्याने आता दिसू लागल्या आहेत. 

ठळक मुद्देइतिहासाच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी गर्दी

- राम शिनगारे 

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पातील पाणी आटल्याने शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामी यांच्या ध्यानसाधनेने पावन झालेल्या सावखेडा गावातील पुरातन वास्तू, मंदिरांच्या खाणाखुणा दिसू लागल्या आहेत. तब्बल ४२ वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या या गावातील गणेश, दत्त, नृसिंह आदी मंदिरे उघडी पडली आहेत. कधी न दिसणारे वैभव पाहण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यासह नगर, जालना जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

मराठवाड्यातील जलसिंचन आणि विद्युतनिर्मितीसाठी १९६५ साली पैठण येथील गोदावरी नदीवर विशाल मातीच्या धरणाचे बांधकाम सुरू करण्यात आले. १९७६ साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. ९ हजार ९९७ मीटर (दहा किलोमीटर) लांबी आणि ४१.३ मीटर उंची असलेल्या या महाकाय धरणाने स्वत:च्या उदरात १०५ गावांना घेतले. ३५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. जायकवाडीच्या विशाल जलाशयाला नाथसागर असे नाव देण्यात आले. हा नाथसागर २०१८ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे शून्य टक्क्यांच्या खाली पाणीसाठा पोहोचला आहे. औरंगाबाद, जालना शहरांसह उद्योग आणि परिसरातील गावखेड्यांना मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या ‘बॅक वॉटर’खालची विस्तीर्ण भूमी भेगाळली आहे. धरणात रबी हंगामात गहू, टरबुजासह इतर पिकेही घेण्यात आली आहेत. मात्र, उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे पात्रातील पाणी आक्रसले आहे. 

धरणामुळे विस्थापित झालेल्या गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावांच्या खाणाखुणा पाणी आटल्याने आता दिसू लागल्या आहेत. या ऐतिहासिक गावाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ११४२ मध्ये महानुभाव संप्रदायाच्या चक्रधर स्वामी यांनी भ्रमंती करीत असताना सावखेडा येथील खडकुली संस्थानला भेट दिली होती. यावेळी त्यांनी संगमेश्वर आणि चिंचकपाट येथे ध्यानधारणा केल्याचेही  पैठण येथील महंत चक्रपाणी बाबा शिवलीकर यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणाला भेट देण्यासाठी महानुभव संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. याचवेळी सावखेडा गावच्या परिसरातील पाण्यात गेलेले इतर हिंदू देवस्थानांचे कळस, भिंतीही उघड्या झाल्या आहेत. यात गणपती मंदिर, बाळकृष्ण महाराजांचा मठ, नृसिंह मंदिर, दत्त मंदिर, शंकर महाराज यांच्या मठाचा समावेश आहे. या ऐतिहासिक वास्तूपर्यंत जाण्यासाठी आताही बोटीचा वापर करावा लागतो. महंत चक्रपाणी बाबा शिवलीकर यांच्या सांगण्यानुसार या मंदिरांची निर्मिती ही यादव काळात झालेली असावी. 

४२ वर्षे पाण्याखाली, तरी भिंती मजबूतजायकवाडी धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन १९७६ पासून पाणीसाठ्याला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत नाथसागर भरल्यामुळे बॅक वॉटरमधील गावे पाण्याखाली बुडाली होती. तेव्हापासून दोन ते तीन वेळाच उघडी पडलेली सावखेडातील मंदिरे ४२ वर्षांपासून पाण्याखाली असली तरी मजबूत आहेत. दत्त मंदिरावर कोरलेल्या कलाकृती आताही ठळकपणे दिसतात. शंकर महाराज मठाच्या भिंतीवर ठिकठिकाणी शिवलिंग कोरलेले आहे. दरवाजासमोर नंदीही दिसतो. तो अद्यापही सुस्थितीत आहे. उर्वरित मंदिरांच्या भिती, दरवाजे टणक असल्याचे पाहणीत दिसून आले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दीमागील आठ दिवसांपासून महानुभव संप्रदायातील भाविकांनी चक्रधरस्वामी यांनी ध्यानधारणा केलेल्या खडकुली संगमेश्वर, चिंचकपाट या ठिकाणी भेटी देण्यासाठी गर्दी केली आहे. पर्यटकांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या घेऊन भाविक या ठिकाणी नेवासे, पुनर्वसित सावखेडामार्गे येत आहेत.

विविध गावांचे अवशेष उघडजायकवाडीत गडप झालेल्या विविध गावांचे, मंदिरांचे अवशेष यंदा उघडे पडले आहेत. यात गंगापूर व नेवासा तालुक्यांतील बहुतांश गावांचा समावेश आहे. या गावातील मदिरांनाही भेटी देणाऱ्यांची संख्या आठ दिवसांमध्ये चांगली वाढली आहे.

झाडांची खोडेसुद्धा दिसताहेतदत्त मंदिर, नृसिंह मंदिर, शंकर मंदिर परिसरात मोठमोठी झाडे असल्याच्या खुणा अद्यापही कायम आहेत. चक्रधरस्वामी यांनी ध्यानधारणा केलेल्या चिंचकपाट या ठिकाणी चिंचेची मोठमोठी झाडे होती. या झाडांच्या खोबणीत बसून त्यांनी ध्यानधारणा केली. या चिंचेच्या झाडांची महाकाय खोडेही उघडी पडली आहेत. ४२ वर्षे पाण्याखाली असूनही झाडांची उभी खोडे पाहून भाविक आश्चर्यचकित होत आहेत.

पहा व्हिडिओ

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीTempleमंदिर