शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद पुलावरुन दुचाकी पडली

By admin | Updated: June 10, 2014 00:15 IST

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़
सोमवारी ज्ञानदेव सूर्यकांत अंभोरे (वय ३५), बबन हरिभाऊ मोरे (४०) व दादाराव आश्रोजी नवघरे (सर्व रा. रिसोड) हे तिघे एका दुचाकीवरुन येलदरी येथून रिसोडकडे निघाले. त्यांची दुचाकी येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावर आल्यानंतर दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि तिघेही दुचाकीसह पुलावरून खाली पडले़ यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले़ ही घटना सोमवारी सायंकाळी ६़४५ वाजता घडली़
या घटनेची माहितीे येलदरी येथील शेषराव चव्हाण व अनंत माकोडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाखाली पाण्यात पडलेल्या जखमींना बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले़ परंतु, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना रुग्णवाहिकेतून जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयातात दाखल केले़ जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ज्ञामदेव अंभोरे व बबन मोरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे़ (वार्ताहर)
बळी घेतल्यानंतर पुलाचे काम होणार का ?
जिंतूर- रिसोड महामार्गाला जोडणारा पूल येलदरी धरणाजवळ ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. हा पूल अरुंद आहे़ त्यामुळे या पुलावरुन जड वाहतूक होत नाही़ एका वेळी एकच मोठे वाहन पुलावरून जाते़ त्यामुळे या पुलावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे़ गेल्यावर्षी या पुलावर बसचालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून बस खाली पडली होती. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला़ त्यानंतर १७ मे रोजी एका ट्रेलरने या पुलावरील सगळे कठडे तोडून टाकले़ त्यामुळे हा पूल आणखीच अरुंद झाला आहे़ पुलाला कठडे नसल्याने दुचाकीस्वार पुलावरुन नदीत पडले़ पुलाखाली पाणी असल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही़ अशा घटना होऊनही बांधकाम विभागाला देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे़
नवीन पुलाचे काम कधी होणार?
येलदरी धरणाजवळी पूल अरुंद असल्याने जड वाहतूक करणे अवघड झाले आहे़ हा पूल मराठवाडा व विदर्भाला जोडणार असून या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़ एखादी जीवित हानी झाल्यानंतरच नवीन पुलाचे काम सुरू होत की काय? असा प्रश्न ग्रामस्थांमधून केला जात आहे़