शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘नांमका’तून गुरुवारी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:19 IST

वैजापूर, गंगापूर तालुक्याला फायदा : पाणीचोरी रोखण्यासाठी दंगा काबू पथकाची नियुक्ती

वैजापूर : नांदूर -मधमेश्वर जलद कालव्यातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारीला ‘नांमका’तून १.२७ टीएमसी पाणी वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे हे पाणी आवर्तन पिण्यासाठी आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी चोरी करणाऱ्यांवर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी चक्क पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे. दरम्यान, या आवर्तनामुळे पाणीटंचाईची झळ सोसणाºया लाभक्षेत्रातील १०२ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.यंदा वैजापूर तालुक्यावर दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले आहेत. या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ प्रशासनासह आपणा सर्वांवर निसर्गाने आणली आहे. त्यातच सर्वात मोठे संकट पिण्याच्या पाण्याचे असून तालुक्यातील सगळेच जलसाठे हिवाळ्यातच कोरडे पडले आहेत. त्यामुळे आहे ते पाणी वाचविण्यासाठी प्रशासनाने मोठी खबरदारी घेतलेली आहे. नांदूर -मधमेश्वर जलद कालव्यातून कि.मी.शून्य ते कि.मी ७० या अंतरात वरील भागातील शेतकरी मुख्य कालव्यातून बेसुमार पाण्याची चोरी आवर्तनादरम्यान करतात. त्यामुळे वैजापूर अणि गंगापूर तालुक्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. तर काही गावे पाण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे उपलब्ध कमी अधिक प्रमाणात मिळणाºया पाण्यावरून लाभक्षेत्रातील शेतकºयात संघर्ष होतो. हा पाणी चोरीचा प्रकार थांबविण्यासाठी यंदा प्रशासनाने जो प्रयत्न कालव्यात पाण्याचा विसर्ग सुरु राहणार तो पर्यंत पोलिसाचे दंगा काबू पथक तैनात करणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘नांमका’चे आवर्तन मिळण्यासाठी आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर, शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव डोंगरे यांनी आंदोलने करुन सतत औरंगाबाद व नाशिक पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता; तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी अणि भाजपचे ज्येष्ठ नेते मोहनराव आहेर यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकºयांची व्यथा मांडली होती. शिवसेनेकडूनही पाणी सोडण्यासाठी नेते मंडळी आक्रमक झाले होते. पण नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून सोडण्यात येणार, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व पाण्याच्या मागणीचा अभाव ही कारणे पुढे करत तसेच शिल्लक पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने हे आवर्तन मार्च किंवा एप्रिलमध्ये सोडण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले होते. मात्र, सततच्या पाठपुराव्यामुळे व काही प्रमाणात शेतकºयांकडून मागणी अर्ज आल्याने अखेर २१ फेब्रुवारीला हे आवर्तन नांदूर मधमेश्वर कालव्यातून सोडण्यात येणार असल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत. दरम्यान, शेतकºयांनी आवर्तनातील पाण्याने पिण्यासाठी गावाजवळचे पाझर तलाव भरून घ्यावेत, असे आवाहन ‘नांमका’ विभागाने केले आहे.चाºया, पोटचाºयांची दुरवस्थानांदूर मधमेश्वर कालव्यातील लाभक्षेत्रातील गावांमधील अनेक ठिकाणच्या चाºया, पोटचाºया अपूर्णावस्थेत असल्यामुळे देखील शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. यंदा वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात या वर्षी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या प्रमाणात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे लाभक्षेत्रातील पाझर तलाव कोरडेठाक असून विहिरींनीदेखील तळ गाठलेला असल्यामुळे हे आवर्तन शेतकºयांसाठी आवश्यक आहे.वैजापूर तालुक्यातील ८२ गावांत पाणीटंचाईवैजापूर तालुक्यावर यंदा वरुणराजाने अवकृपा केल्याने सुमारे ८२ गावांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मन्याड मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने पाणीचोर मोकाट झाले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे १२४ टँकर सुरू आहेत, तर ८७ विहिरी अधिग्रहित करून पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. येणाºया एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात काही गावांना वर्षभर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई