शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

‘नांमका’तून गुरुवारी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:19 IST

वैजापूर, गंगापूर तालुक्याला फायदा : पाणीचोरी रोखण्यासाठी दंगा काबू पथकाची नियुक्ती

वैजापूर : नांदूर -मधमेश्वर जलद कालव्यातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारीला ‘नांमका’तून १.२७ टीएमसी पाणी वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे हे पाणी आवर्तन पिण्यासाठी आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी चोरी करणाऱ्यांवर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी चक्क पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे. दरम्यान, या आवर्तनामुळे पाणीटंचाईची झळ सोसणाºया लाभक्षेत्रातील १०२ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.यंदा वैजापूर तालुक्यावर दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले आहेत. या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ प्रशासनासह आपणा सर्वांवर निसर्गाने आणली आहे. त्यातच सर्वात मोठे संकट पिण्याच्या पाण्याचे असून तालुक्यातील सगळेच जलसाठे हिवाळ्यातच कोरडे पडले आहेत. त्यामुळे आहे ते पाणी वाचविण्यासाठी प्रशासनाने मोठी खबरदारी घेतलेली आहे. नांदूर -मधमेश्वर जलद कालव्यातून कि.मी.शून्य ते कि.मी ७० या अंतरात वरील भागातील शेतकरी मुख्य कालव्यातून बेसुमार पाण्याची चोरी आवर्तनादरम्यान करतात. त्यामुळे वैजापूर अणि गंगापूर तालुक्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. तर काही गावे पाण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे उपलब्ध कमी अधिक प्रमाणात मिळणाºया पाण्यावरून लाभक्षेत्रातील शेतकºयात संघर्ष होतो. हा पाणी चोरीचा प्रकार थांबविण्यासाठी यंदा प्रशासनाने जो प्रयत्न कालव्यात पाण्याचा विसर्ग सुरु राहणार तो पर्यंत पोलिसाचे दंगा काबू पथक तैनात करणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘नांमका’चे आवर्तन मिळण्यासाठी आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर, शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव डोंगरे यांनी आंदोलने करुन सतत औरंगाबाद व नाशिक पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता; तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी अणि भाजपचे ज्येष्ठ नेते मोहनराव आहेर यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकºयांची व्यथा मांडली होती. शिवसेनेकडूनही पाणी सोडण्यासाठी नेते मंडळी आक्रमक झाले होते. पण नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून सोडण्यात येणार, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व पाण्याच्या मागणीचा अभाव ही कारणे पुढे करत तसेच शिल्लक पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने हे आवर्तन मार्च किंवा एप्रिलमध्ये सोडण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले होते. मात्र, सततच्या पाठपुराव्यामुळे व काही प्रमाणात शेतकºयांकडून मागणी अर्ज आल्याने अखेर २१ फेब्रुवारीला हे आवर्तन नांदूर मधमेश्वर कालव्यातून सोडण्यात येणार असल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत. दरम्यान, शेतकºयांनी आवर्तनातील पाण्याने पिण्यासाठी गावाजवळचे पाझर तलाव भरून घ्यावेत, असे आवाहन ‘नांमका’ विभागाने केले आहे.चाºया, पोटचाºयांची दुरवस्थानांदूर मधमेश्वर कालव्यातील लाभक्षेत्रातील गावांमधील अनेक ठिकाणच्या चाºया, पोटचाºया अपूर्णावस्थेत असल्यामुळे देखील शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. यंदा वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात या वर्षी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या प्रमाणात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे लाभक्षेत्रातील पाझर तलाव कोरडेठाक असून विहिरींनीदेखील तळ गाठलेला असल्यामुळे हे आवर्तन शेतकºयांसाठी आवश्यक आहे.वैजापूर तालुक्यातील ८२ गावांत पाणीटंचाईवैजापूर तालुक्यावर यंदा वरुणराजाने अवकृपा केल्याने सुमारे ८२ गावांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मन्याड मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने पाणीचोर मोकाट झाले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे १२४ टँकर सुरू आहेत, तर ८७ विहिरी अधिग्रहित करून पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. येणाºया एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात काही गावांना वर्षभर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई