शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संतपीठाचे दिक्षापीठ होऊन आधुनिक संत निर्माण व्हावेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 19:12 IST

संतपीठातून तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख आंबादास दानवे यांनी अर्ज केला

पैठण ( औरंगाबाद ) : संतपीठाचे रूपांतर जागतिक दर्जाच्या विद्यापीठात होऊन  संत साहित्य व सांप्रदायिक ज्ञानाच्या संशोधनातून या संतपीठातून आधुनिक संत निर्माण व्हावेत अशी अपेक्षा रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सतपीठ लोकार्पण सोहळा समारंभात बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  पैठण येथील संतपीठाचे ऑनलाइन उदघाटन केल्यानंतर संतपीठाच्या इमारतीत लोकार्पण सोहळा पार पडला. 

रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले, प्र-कुलगुरू शाम सिरसाठ, माजी प्र कुलगुरू तथा विद्यापीठ व संतपीठाचे समन्वयक प्रवीन वक्ते यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून संतपीठाचे प्रत्यक्ष उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. या समारंभासाठी आमदार अंबादास दानवे, माजी मंत्री अनील पटेल, हभप विठ्ठल शास्त्री चनघटे, अण्णासाहेब लबडे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादा बारे, नंदलाल काळे, विनोद बोंबले, ज्ञानेश्वर कापसे, विलास भुमरे, जितसिंग करकोटक, गणेश मडके, प्रशांत जगदाळे, राखी परदेशी, पुष्पा गव्हाणे, अलका पोटे, ज्योती पठाडे, मंगल मगर, किशोर चौधरी, सुनिल हिंगे, भूषण कावसानकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

परदेशातून संत साहित्याचा अभ्यासाठी विद्यार्थी येतील  संतपीठाच्या विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करावी असे निर्देश मंत्री भुमरे यांनी विद्यापीठ प्रशासनास यावेळी दिले.  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संतपीठाचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे मंत्री भुमरे व माझी जबाबदारी वाढली आहे. संतपीठातून अभ्यासक्रम वाढविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मुभा असल्याचे  मंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. दिड महिण्याचा अवधी द्या संतपीठासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ असेही मंत्री सावंत यांनी कुलगुरु येवले यांना उद्देशून सांगितले. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी संतपीठातून संत रामदास स्वामी यांच्या नावाने कोर्स सुरू केला जाईल परंतु यासाठी थोडावेळ लागेल असे मंत्री सामंत यांनी सांगितले. परदेशातून संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी या संतपीठात येतील या दर्जाचे संतपीठ होईल असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचा - सौरऊर्जा प्रकल्प ते कनेक्टिव्हिटीत वाढ; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वपूर्ण घोषणा

संतपीठाचे दिक्षापीठ व्हावे संतपीठ ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून विषयाचे पुस्तकी व भौतिक ज्ञान देणारे अनेक विद्यापीठ आहेत. मात्र, संतपीठ हे दिक्षापीठ व्हावे अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. वारकरी शिक्षण संस्थांना संतपीठाची सलग्नता देण्यात येईल हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घोषीत केला. विद्यापीठ स्तरावर ३०० परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून संतपीठातील विषय त्यांना समजावून प्रवेश दिला जाईल असेही येवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

आ. अंबादास दानवे संतपीठाचे पहिले विद्यार्थीसंतपीठातून तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख आंबादास दानवे यांनी अर्ज केला असून त्यांनी चार विविध विषयात एमए ही पदवी घेतली आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद