शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज अन ५ वर्षांत पडली अनेक डी.एड. महाविद्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 7:58 PM

महाविद्यालयात ३५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

ठळक मुद्देआजघडीला यापैकी ४१ महाविद्यालये चालू आहेत.२०१५ ला औरंगाबाद जिल्ह्यात ८२ डीएड महाविद्यालये होती.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमाच्या जागा पूर्ण भरलेल्या तर डी. एड. अभ्यासक्रमाच्या जागा अर्ध्याहून अधिक रिक्त अशी विरोधी परिस्थिती सध्या डी. एड. आणि बी. एड. महाविद्यालयांमध्ये आहे. डी. एड. अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज हे त्याचे एक प्रमुख कारण असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.

२०१५ साली औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ८२ डीएड महाविद्यालये होती. आता यापैकी निम्मी महाविद्यालये विविध कारणांमुळे बंद करण्यात आली. डाएट केंद्राकडून डी. एड. महाविद्यालयाचा कारभार पाहण्यात येतो. वेगवेगळ्या कारणांमुळे डाएटच्या नियमावलीत न बसणारी अनेक महाविद्यालयेही बंद आहेत, हेदेखील महाविद्यालये बंद होण्याचे कारण आहे. शिक्षण क्षेत्रात झालेला आणखी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे बी. एड. झालेल्या शिक्षकांना आता प्राथमिक वर्गांना शिकविण्याचीही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे बी. एड. केले तर माध्यमिक आणि प्राथमिक, अशी दोन्ही दालने खुली होत असल्याने साहजिकच विद्यार्थ्यांचा ओढा बी. एड. कडे वाढला आहे. तसेच डी. एड. आता चार वर्षांचे होणार, डी. एड. अभ्यासक्रम बंद होणार, डी. एड. केले तर नोकरी मिळत नाही, अशा चुकीच्या चर्चेतून डी. एड. करणे म्हणजे निरर्थकच आहे, असा समज बहुसंख्य विद्यार्थ्यांचा झालेला आहे.

केवळ अनुदानासाठीच महाविद्यालये कामोठमोठ्या इमारती आणि विद्यार्थ्यांअभावी रिकामे पडलेले वर्ग अशी सध्याच्या अनेक डी. एड. महाविद्यालयांची अवस्था आहे. या महाविद्यालयांच्या निम्म्याहून जास्त जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे केवळ अनुदानासाठीच डी. एड. महाविद्यालये सुरू आहेत का, असा प्रश्नही अनेकांना पडला.

गैरसमजामुळे प्रवेश घटलेडी. एड. केल्यानंतर नोकरी मिळत नाही, डी. एड. केले तर काही भविष्य नाही किंवा डी. एड. आता बंद होणार आहे, असे डी. एड. विषयी अनेक गैरसमज आहेत. यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याने डी. एड. ला प्रवेश घेण्याचे प्रमाण घटले. इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या शाळांनाही प्रशिक्षित शिक्षकांचीच गरज आहे. त्यामुळे गुणवत्ता असेल तर संधी निश्चित मिळणारच.- डॉ. सतीश सुराणा

शिक्षकी पेशा सोडलाडी. एड. केल्यानंतर अनेक वर्षे विनाअनुदानित शाळेत अत्यंत कमी पगारावर नोकरी करावी लागली. मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण जात होते. त्यामुळे आता शिक्षकी पेशा सोडला असून एका खाजगी कार्यालयात काम करत आहे.- प्रविण सोनवणे

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी