शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सलीम अली सरोवराची दयनीय अवस्था; सरोवरात दूषित पाण्याचा ३२ वर्षांपासून रतीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 18:12 IST

ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती.

ठळक मुद्देपूर्वी सलीम अली सरोवरात कमळाच्या फुलांची चादर पसरलेली असायची. १९८०च्या दशकात सरोवरात दूषित पाणी सोडले जाऊ लागले.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरात सोडले जाणारे दूषित पाणी रोखण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देऊन तब्बल ३२ वर्षे उलटली आहेत. न्यायालयात शपथपत्राद्वारे दिलेले अभिवचन पूर्ण करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने सलीम अली सरोवराची गटारगंगा होण्याच्या दिशेने वेगात वाटचाल सुरू आहे. सरोवराच्या या दयनीय अवस्थेने व्यथित झालेले याचिकाकर्ते, इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी हे सरोवर वाचविण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे.

ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती. सरोवरात सोडलेले दूषित पाणी त्वरित बंद करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली. तेव्हा सिडको प्रशासनाने खंडपीठाला शपथपत्र देऊन एका वर्षात दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. उद्देश सफल झाल्याने ती याचिका निकाली काढण्यात आली. मात्र, ३२ वर्षे उलटल्यानंतरही दूषित पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. सिडको प्रशासनाने दूषित पाणी रोखण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत. उलट हा प्रकार आता राजरोसपणे सुरू आहे, अशी खंत डॉ. शेख यांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केली.

मलीक अंबरने १६१० ते १६१६ या काळात या तलावाची निर्मिती केली. औरंगजेब यांच्या कार्यकाळात हिमायतबागेची उभारणी झाली. पूर्वी सलीम अली सरोवरात कमळाच्या फुलांची चादर पसरलेली असायची. १९९० पर्यंत शहरातील नागरिकांनी या नयनमनोहर दृष्याचा आनंद घेतला आहे. १९८०च्या दशकात सरोवरात दूषित पाणी सोडले जाऊ लागले. त्यामुळे कमळ हळूहळू नष्ट झाले. इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी दोनदा पुन्हा कमळ लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दूषित पाण्यामुळे कमळ जगतच नसल्याचा अनुभव त्यांना आला.

पालिकाच सोडते सरोवरात दूषित पाणीसन २०१०मध्ये महापालिकेने ३ कोटी रुपये खर्च करून सरोवराच्या बाजुला ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला. मागील ११ वर्षांपासून प्रक्रिया केलेले पाणी सरोवरात सोडण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले पाणी किती दूषित आहे, याचा विचारच मनपा प्रशासन करायला तयार नाही.

सरोवराच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्षऐतिहासिक वारसा सांभाळणे हे शहराचे कर्तव्य आहे. सरोवराच्या चारही बाजूने अतिक्रमणे होत आहेत. दूषित पाणी सोडण्यात येत आहे. काही वर्षांनंतर येथे सरोवर होते, असे म्हणायची वेळ येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. सरोवराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करायला हवेत.- डॉ. रमजान शेख, इतिहासतज्ज्ञ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ