शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सलीम अली सरोवराची दयनीय अवस्था; सरोवरात दूषित पाण्याचा ३२ वर्षांपासून रतीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 18:12 IST

ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती.

ठळक मुद्देपूर्वी सलीम अली सरोवरात कमळाच्या फुलांची चादर पसरलेली असायची. १९८०च्या दशकात सरोवरात दूषित पाणी सोडले जाऊ लागले.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरात सोडले जाणारे दूषित पाणी रोखण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देऊन तब्बल ३२ वर्षे उलटली आहेत. न्यायालयात शपथपत्राद्वारे दिलेले अभिवचन पूर्ण करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने सलीम अली सरोवराची गटारगंगा होण्याच्या दिशेने वेगात वाटचाल सुरू आहे. सरोवराच्या या दयनीय अवस्थेने व्यथित झालेले याचिकाकर्ते, इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी हे सरोवर वाचविण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे.

ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती. सरोवरात सोडलेले दूषित पाणी त्वरित बंद करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली. तेव्हा सिडको प्रशासनाने खंडपीठाला शपथपत्र देऊन एका वर्षात दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. उद्देश सफल झाल्याने ती याचिका निकाली काढण्यात आली. मात्र, ३२ वर्षे उलटल्यानंतरही दूषित पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. सिडको प्रशासनाने दूषित पाणी रोखण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत. उलट हा प्रकार आता राजरोसपणे सुरू आहे, अशी खंत डॉ. शेख यांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केली.

मलीक अंबरने १६१० ते १६१६ या काळात या तलावाची निर्मिती केली. औरंगजेब यांच्या कार्यकाळात हिमायतबागेची उभारणी झाली. पूर्वी सलीम अली सरोवरात कमळाच्या फुलांची चादर पसरलेली असायची. १९९० पर्यंत शहरातील नागरिकांनी या नयनमनोहर दृष्याचा आनंद घेतला आहे. १९८०च्या दशकात सरोवरात दूषित पाणी सोडले जाऊ लागले. त्यामुळे कमळ हळूहळू नष्ट झाले. इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी दोनदा पुन्हा कमळ लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दूषित पाण्यामुळे कमळ जगतच नसल्याचा अनुभव त्यांना आला.

पालिकाच सोडते सरोवरात दूषित पाणीसन २०१०मध्ये महापालिकेने ३ कोटी रुपये खर्च करून सरोवराच्या बाजुला ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला. मागील ११ वर्षांपासून प्रक्रिया केलेले पाणी सरोवरात सोडण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले पाणी किती दूषित आहे, याचा विचारच मनपा प्रशासन करायला तयार नाही.

सरोवराच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्षऐतिहासिक वारसा सांभाळणे हे शहराचे कर्तव्य आहे. सरोवराच्या चारही बाजूने अतिक्रमणे होत आहेत. दूषित पाणी सोडण्यात येत आहे. काही वर्षांनंतर येथे सरोवर होते, असे म्हणायची वेळ येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. सरोवराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करायला हवेत.- डॉ. रमजान शेख, इतिहासतज्ज्ञ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ