शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सलीम अली सरोवराची दयनीय अवस्था; सरोवरात दूषित पाण्याचा ३२ वर्षांपासून रतीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 18:12 IST

ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती.

ठळक मुद्देपूर्वी सलीम अली सरोवरात कमळाच्या फुलांची चादर पसरलेली असायची. १९८०च्या दशकात सरोवरात दूषित पाणी सोडले जाऊ लागले.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरात सोडले जाणारे दूषित पाणी रोखण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देऊन तब्बल ३२ वर्षे उलटली आहेत. न्यायालयात शपथपत्राद्वारे दिलेले अभिवचन पूर्ण करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने सलीम अली सरोवराची गटारगंगा होण्याच्या दिशेने वेगात वाटचाल सुरू आहे. सरोवराच्या या दयनीय अवस्थेने व्यथित झालेले याचिकाकर्ते, इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी हे सरोवर वाचविण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे.

ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती. सरोवरात सोडलेले दूषित पाणी त्वरित बंद करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली. तेव्हा सिडको प्रशासनाने खंडपीठाला शपथपत्र देऊन एका वर्षात दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. उद्देश सफल झाल्याने ती याचिका निकाली काढण्यात आली. मात्र, ३२ वर्षे उलटल्यानंतरही दूषित पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. सिडको प्रशासनाने दूषित पाणी रोखण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत. उलट हा प्रकार आता राजरोसपणे सुरू आहे, अशी खंत डॉ. शेख यांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केली.

मलीक अंबरने १६१० ते १६१६ या काळात या तलावाची निर्मिती केली. औरंगजेब यांच्या कार्यकाळात हिमायतबागेची उभारणी झाली. पूर्वी सलीम अली सरोवरात कमळाच्या फुलांची चादर पसरलेली असायची. १९९० पर्यंत शहरातील नागरिकांनी या नयनमनोहर दृष्याचा आनंद घेतला आहे. १९८०च्या दशकात सरोवरात दूषित पाणी सोडले जाऊ लागले. त्यामुळे कमळ हळूहळू नष्ट झाले. इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी दोनदा पुन्हा कमळ लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दूषित पाण्यामुळे कमळ जगतच नसल्याचा अनुभव त्यांना आला.

पालिकाच सोडते सरोवरात दूषित पाणीसन २०१०मध्ये महापालिकेने ३ कोटी रुपये खर्च करून सरोवराच्या बाजुला ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला. मागील ११ वर्षांपासून प्रक्रिया केलेले पाणी सरोवरात सोडण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले पाणी किती दूषित आहे, याचा विचारच मनपा प्रशासन करायला तयार नाही.

सरोवराच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्षऐतिहासिक वारसा सांभाळणे हे शहराचे कर्तव्य आहे. सरोवराच्या चारही बाजूने अतिक्रमणे होत आहेत. दूषित पाणी सोडण्यात येत आहे. काही वर्षांनंतर येथे सरोवर होते, असे म्हणायची वेळ येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. सरोवराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करायला हवेत.- डॉ. रमजान शेख, इतिहासतज्ज्ञ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ