शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 4:07 PM

स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या.

औरंगाबाद : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना जवळपास पूर्ण झाली आहे. तर कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित सोमवारी पाण्याची चाचणी होणार असून, अधिवेशन संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या योजनेच्या पाण्याच उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

सततच्या वेगवेगळ्या कारणांनी ही योजना गेल्या 10 वर्षांपासून रखडली होती. स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या. त्यातच मोबदल्याच्या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र पोलीस बंदोबस्तात हे काम सुरु ठेवण्यात आले आणि अखेर या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर पुढील आठवड्यात उद्घाटन सुद्धा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाली असून, अंतिम चाचणीनंतर गावकऱ्यांना थेट पाणी मिळणार आहे. जायकवाडी धरण परिसरात पंपहाऊस उभारण्यात आले असून तेथून हे पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे खेर्डा प्रकल्पात थेट पाणी जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर होणार आहे. तर ही योजना पूर्ण झाल्यावर 55 गावंचा प्रश्न मिटणार असून, 14 हजार 582 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.

भूमरेंनी शब्द पाळला

निवडणुका येताच सर्वच पक्षाकडून ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनावरून राजकरण केले जात असल्याचे पाहायला मिळायचे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तर 2020 पूर्वीच ही योजना पूर्ण करणार असल्याचं आश्वासन भुमरे यांनी गावकऱ्यांना दिले होते. त्यामुळे योजनेचे काम पाहता भूमरेंनी आपला शब्द पाळला असल्याचं शेतकरी बोलत आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा तांत्रिकदृष्ट्या 100 टक्के पूर्ण झाला असून, पाण्याच्या चाचण्या घेण्यात येत आहे. योजनेच्या उद्घाटन झाल्यावर गावकऱ्यांना या पाण्याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. मात्र असे असताना सुद्धा काही लोकं अफवा पसरवण्याचे काम करत आहे. अनिल निंभोरे (कार्यकारी अभियंता )