शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

इज्तेमाच्या संयोजकांनी जिंकले अथांग जनसागराचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:10 IST

औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला. महाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. संयोजकांनी या आदरातिथ्याने उपस्थित लाखो साथींची मनेही जिंकली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या नागरिकांच्या राहण्याची, जेवण, अंघोळ आदी व्यवस्था कशा पद्धतीने केली यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता संयोजन समितीच्या सदस्यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून जमीन ताब्यात घेणे, सपाटीकरण आदी कामे सुरू केली. शेतकर्‍यांचा कापूस वेचण्यासाठी महिला सापडत नव्हत्या. आजपासच्या गावांमध्ये आवाहन करून तब्बल एक हजार मुस्लिम महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण कापसाची वेचणी करून दिली.

आमीर साहब यांनी प्रत्येक जिल्ह्याला कामांची वाटणी करून दिली होती. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील जबाबदार लोक रात्रंदिवस काम करीत होते. २ हजार एकर परिसरात तब्बल २१ विहिरी होत्या. या विहिरींचे पाणी एका मोठ्या शेततळ्यात आणून टाकले. १ कोटीपेक्षा अधिक क्षमतेची आठ मोठी शेततळी उभारली. पाणी शुद्धीकरणासाठी संप उभारण्यात आले. वजूखाने, शौचालये, बाथरूमची संख्या जवळपास ५० हजरांपेक्षा जास्त होती. संपूर्ण वीजव्यवस्थेची जबाबदारी चिकलठाणा येथील सद्गृहस्थाने घेतली. 

नांदेड येथील तज्ज्ञ वास्तुविशारदाने संपूर्ण ड्रॉर्इंग तयार करून दिले. इज्तेमास्थळी तब्बल ५० कि.मी.च्या अंतर्गत पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या. ड्रेनेजव्यवस्थाही वेगळी करण्यात आली. अंघोळ, हातपाय धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याची वेगळी व्यवस्था करून ते परिसरात जिरविण्यात आले. त्यामुळे या भागातील विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुख्य मंडप ९१ लाख चौरस फुटांचा ठेवण्यात आला. त्यात ऐनवेळी वाढ करून तो १ कोटी ५ लाख चौरस फूट करण्यात आला. इज्तेमा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला. 

ऐहतेकाफ, रोजेइज्तेमा यशस्वीतेसाठी ‘दुआ’ करण्यात काही साथी २४ तास मग्न होते. १७ साथी मुख्य मंडपात ऐहतेकाफमध्ये बसले होते. प्रत्येक जिल्ह्याच्या मंडपात ५ साथी ऐहतेकाफ आणि रोजे ठेवून होते. मागील तीन महिन्यांपासून ही त्यांची दिनचर्या होती.

विदेशी नागरिकांसाठी ए.सी. कक्षमुख्य मंडपापासून हाकेच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय साथींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. ३ हजार साथी थांबतील, अशी व्यवस्था तिथे होती. येथील कक्ष वातानुकूलित तयार केले होते. राज्यभरातून आलेल्या काही व्हीआयपी साथींसाठी कूलरसह बाजूलाच कक्ष केला होता.

पंढरपूर ट्रस्टचे पदाधिकारी आलेसोलापूर येथील पंढरपूर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी तीन दिवसांपूर्वीच इज्तेमास्थळी हजेरी लावली. दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. इज्तेमाप्रमाणे आम्हालाही सोयी-सुविधा देता येऊ शकतील का, याचा आढावा त्यांनी घेतला. संपूर्ण इज्तेमा स्थळ फिरून त्यांनी पाहणी केल्याचे संयोजकांनी सांगितले.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८