शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

इज्तेमाच्या संयोजकांनी जिंकले अथांग जनसागराचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:10 IST

औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला. महाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. संयोजकांनी या आदरातिथ्याने उपस्थित लाखो साथींची मनेही जिंकली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या नागरिकांच्या राहण्याची, जेवण, अंघोळ आदी व्यवस्था कशा पद्धतीने केली यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता संयोजन समितीच्या सदस्यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून जमीन ताब्यात घेणे, सपाटीकरण आदी कामे सुरू केली. शेतकर्‍यांचा कापूस वेचण्यासाठी महिला सापडत नव्हत्या. आजपासच्या गावांमध्ये आवाहन करून तब्बल एक हजार मुस्लिम महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण कापसाची वेचणी करून दिली.

आमीर साहब यांनी प्रत्येक जिल्ह्याला कामांची वाटणी करून दिली होती. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील जबाबदार लोक रात्रंदिवस काम करीत होते. २ हजार एकर परिसरात तब्बल २१ विहिरी होत्या. या विहिरींचे पाणी एका मोठ्या शेततळ्यात आणून टाकले. १ कोटीपेक्षा अधिक क्षमतेची आठ मोठी शेततळी उभारली. पाणी शुद्धीकरणासाठी संप उभारण्यात आले. वजूखाने, शौचालये, बाथरूमची संख्या जवळपास ५० हजरांपेक्षा जास्त होती. संपूर्ण वीजव्यवस्थेची जबाबदारी चिकलठाणा येथील सद्गृहस्थाने घेतली. 

नांदेड येथील तज्ज्ञ वास्तुविशारदाने संपूर्ण ड्रॉर्इंग तयार करून दिले. इज्तेमास्थळी तब्बल ५० कि.मी.च्या अंतर्गत पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या. ड्रेनेजव्यवस्थाही वेगळी करण्यात आली. अंघोळ, हातपाय धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याची वेगळी व्यवस्था करून ते परिसरात जिरविण्यात आले. त्यामुळे या भागातील विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुख्य मंडप ९१ लाख चौरस फुटांचा ठेवण्यात आला. त्यात ऐनवेळी वाढ करून तो १ कोटी ५ लाख चौरस फूट करण्यात आला. इज्तेमा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला. 

ऐहतेकाफ, रोजेइज्तेमा यशस्वीतेसाठी ‘दुआ’ करण्यात काही साथी २४ तास मग्न होते. १७ साथी मुख्य मंडपात ऐहतेकाफमध्ये बसले होते. प्रत्येक जिल्ह्याच्या मंडपात ५ साथी ऐहतेकाफ आणि रोजे ठेवून होते. मागील तीन महिन्यांपासून ही त्यांची दिनचर्या होती.

विदेशी नागरिकांसाठी ए.सी. कक्षमुख्य मंडपापासून हाकेच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय साथींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. ३ हजार साथी थांबतील, अशी व्यवस्था तिथे होती. येथील कक्ष वातानुकूलित तयार केले होते. राज्यभरातून आलेल्या काही व्हीआयपी साथींसाठी कूलरसह बाजूलाच कक्ष केला होता.

पंढरपूर ट्रस्टचे पदाधिकारी आलेसोलापूर येथील पंढरपूर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी तीन दिवसांपूर्वीच इज्तेमास्थळी हजेरी लावली. दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. इज्तेमाप्रमाणे आम्हालाही सोयी-सुविधा देता येऊ शकतील का, याचा आढावा त्यांनी घेतला. संपूर्ण इज्तेमा स्थळ फिरून त्यांनी पाहणी केल्याचे संयोजकांनी सांगितले.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८