शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बिलोलीतील कस्तुरबा गांधी विद्यालयाचे स्थलांतर पाणीपुरवठ्याअभावी रखडले

By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST

बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे.

बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे. दीडशे मुलींसाठीची इमारत तयार असून पाणीपुरवठ्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. अर्धवट शाळा सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून शासनाने सात वर्षांपूर्वी बिलोली तालुका पातळीवर कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयाचे निर्माण केले होते. प्रारंभी सेवाभावी संस्थाकडून विविध प्रस्ताव मागविण्यात आले. पात्रतेनुसार संबंधित संस्थांना अशा शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र बिलोलीसाठी मंज़ूर शाळा खतगावकर आणि एंबडवार यांच्या उच्चन्यायालयीन लढाईनंतर संस्थेऐवजी स्थानिक शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली. तहसीलदार अध्यक्ष, गटशिक्षणाधिकारी पदसिद्ध सचिव म्हणून नेमण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंत वर्गही सुरु झाले. शाळा गांधीनगरच्या परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. शाळेसाठी स्वतंत्र मालकीच्या इमारतीसाठी अनुदान मंजूर झाले. इमारतीसाठी उंच टेकडीवर मोकळी जागा देण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला. प्रारंभी बांधकामासाठी पाणी नसल्याने ठेकेदाराने रडत- रडत काम केले. अर्धवट सोडून नंतर तो निघून गेला. दोन वर्षांनंतर दुसऱ्या ठेकेदाराडून इमारतीचे काम करुन घेण्यात आले. टँकरद्वारे पाणी आणून काम पूर्ण झाले. संपूर्ण मुलींसाठी शिकवणी खोल्या, कार्यालय, स्वयंपाक घर, स्वच्छतागृह, वसतिगृह, प्रयोगशाळा, हॉल आदींचे काम पूर्ण झाले. भाड्याच्या इमारतीमधील शाळा रिकामी करुन जून १४ च्या शैक्षणिक वर्षांपासून नूतन इमारतीमध्ये शाळा स्थलांतरीत करावी, असे आदेश नांदेड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. मात्र पाण्याअभावी शाळा कशी स्थलांतरीत करावी, ही समस्या उभी राहिल्याने स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. सुरक्षा रक्षकाची आवश्यकतासद्यस्थिीतील भाड्याची इमारत व शाळा गांधीनगरच्या मध्यवस्तीत आहे. शेजारी इमारत आणि उचभ्रू वस्ती आहे. त्यामुळे येथे भितीचे वातावरण नाही, पण नूतन इमारत उंच टेकडीवर असून पाठीमागे वनखात्याची जमीन आहे. येथे दिवसादेखील निर्मणुष्य परिस्थिती असते. अद्याप तरी कस्तुरबा विद्यालयाकडे कोणत्याही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती झालेली नाही. मुलींना शिकविणाऱ्या सर्वच महिला शिक्षिका आहे, अशा स्थितीत कोणती घटना होईल. हे सांगता येत नाही. मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येथे बंदूकधारी सुरक्षा रक्षकाची गरज आहे, असे मुख्याध्यापिका जी. आर. सावळे यांनी सांगितले. बिलोली पालिका पाणी पुरवठा करेल, असे आश्वासन पालिका प्रशासनाडून आल्यानंतरच येथे इमारत पूर्ण करण्यात आली. सध्या पाण्याची सोय न झाल्यानेच स्थलांतर थांबले आहे. संपूर्ण मूलभूत सुविधा पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतरच निवासी शाळा हलविण्यात येईल- माधव सलगर, गटशिक्षणाधिकारी तथा सचिवबिलोली शहरवासीयांनाच मागील दोन वर्षांपासून एक- दिवस आड व एकच वेळ पाणीपुरवठा होत आहे. बिलोलीच्या जलकुंभातून पाणी देणे शक्यच नाही. शाळा प्रशासनाने स्वतंत्र उपायायोजना हाती घ्यावी. त्यात उंच टेकडीवर पाणीपुरवठा कसे शक्य आहे- भीमराव जेठे, नगरसेवक, माजी नगराध्यक्षकोणत्याही अप्रिय घटना नाकारता येत नाहीत. राज्यासह देशात महिला अत्याचाराबाबतच्या घटना आपण दररोज पाहत आहोत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी २४ तास रक्षकाची कायम नियुक्ती करावी- जमनाबाई खंडेराय, नगराध्यक्षा, बिलोली