शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

विधी विभागातून जमिनीच्या मावेजाच्या संचिकेला फुटले पाय; सहा वर्षांपासून शेतकऱ्याचे हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:04 IST

विधी विभागावर शेतकऱ्याने ओढले ताशेरे

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गात जमिनीचे संपादन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मावेजा मिळाला. मात्र भूसंपादन होताना जमीन यलो झाली असल्यामुळे त्या दराने भाव मिळावा, यासाठी सहा वर्षांपासून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी संचिका तपासणीसाठी विधी विभागाकडे पाठविलेली असताना तेथून संचिका गायब झाल्याचा आरोप करीत जमीन मालक ताराचंद भाटी यांनी गुरुवारी केला. विधी विभाग मुजोरीने वागत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचा आरोप करीत भाटी व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अकांडतांडव केले. भाटी यांची पंढरपूरमध्ये गट क्र. १७ मध्ये ५ एकर ९ गुंठे जमीन आहे. त्यातील ८४ गुंठे जमिनीचे २०१५ एनए केली. त्यातील महामार्गात ३६ गुंठे जमीन गेली. एनए जमिनीचा मोबदला वेगळा आहे. ग्रीन जमिनीसाठी मोबदल्याचे दर वेगळे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ग्रीन वर्गची जमीन म्हणून मोबदला जागा मालकांनी घेतला. परंतु यलो जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू असूनही त्यात काहीही न्याय मिळालेला नाही.

१० वर्षांपासून एकच विधी सल्लागारजिल्हाधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार हे पद कंत्राटी आहे. परंतु १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उषा वायाळ या त्या पदावर आहेत. प्रशासनातील इतर कंत्राटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना ११ महिने झाले की, त्यांचा कार्यकाळ संपतो. मग एवढ्या वर्षांपासून एकच विधी सल्लागार प्रशासनाने का बदलला नाही. कंत्राटी भरतीची प्रक्रिया का राबविली नाही. ही सगळी मिलीभगत असल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस संंजय केणेकर यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी विधी विभागाकडून छळ होत असल्याचा आरोप केला.

संचिका कुठेही गेलेली नाहीसंचिका कुठेही गेलेली नाही. त्यांची संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडून आली. ती लवाद शाखेकडे गेली. मी आज रजेवर होते. इतर शाखेतील कर्मचारी बाहेर गेलेले होते. त्यांना संचिका शोधून दिली आहे. संचिकेवर स्टम्पिंग झालेले नाही, तशीच संचिका ते घेऊन गेले.-उषा वायाळ, विधी सल्लागार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद